राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास शिंदे गट आणि भाजपाकडून व्यक्त केला जातो. असे असतानाच आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. येत्या १५ दिवसांत इतर पक्षांतील २० ते २५ आमदारांचा शिंदे गट-भाजपात प्रवेश होऊ शकतो, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. कोर्टातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणार का? प्रश्न विचारताच चंद्रकांत खैरे भडकले; रागात म्हणाले “हट्, ज्यांनी…”

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
ajit pawar warned whistle blowing youth pimpri chinchwad state government program
कार्यक्रम पोलिसांचा आहे, उचलायला लावेल; अजितदादांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Sanjay Raut On BJP
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे

“सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतामध्ये आहे. म्हणजेच २० ते २५ आमदार इकडे-तिकडे झाले, तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील काही आमदार आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार कोर्टाकडून दिली जाणारी तारीख आणि आमदारांचा पक्षप्रवेश यामुळेच लांबतो आहे. दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येणार आहेत,” असे बच्चू कडू यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Cow Hug Day : ‘१४ फेब्रुवारीला गायीला मिठी मारा’ केंद्र सरकारच्या निर्देशावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “कोणाला मिठ्या…”

एवढीच हौस असेल तर एकनाथ शिंदे यांच्या जागेवरून लढावे

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. माझ्याविरोधात वरळी मतदारसंघातून लढा असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आव्हान देणे आता जुने झाले आहे. या आव्हानांना काहीही अर्थ नाही. हा थोडा बालीशपणा आहे. जेव्हा विधानसभा निवडणूक जाहीर होईल, तेव्हा त्यांनी आव्हान दिले पाहिजे. एवढीच हौस असेल तर एकनाथ शिंदे यांच्या जागेवरून लढावे,” असे बच्चू कडू म्हणाले.

Story img Loader