२०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून राज्यात पुन्हा राजकीय वादंग सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच विरोधी पक्षनेते अजित पवारांसह ७२ तासांचं सरकार स्थापन केलं होतं, असा गौप्यस्पोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांना लक्ष्य करत सवाल उपस्थित केले आहेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “शरद पवारांकडे सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्र आणि देशात पाहिलं जातं. शरद पवारांना राजकारणातील खडान्-खडा माहिती आहे. मग, आपल्यात घरातील माणूस सकाळी शपथविधी करण्यासाठी जातो, हे माहिती नसेल का?,” असा प्रश्न बच्चू कडूंनी विचारला आहे.

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवार अन् खर्गेंचा वाद…”

हेही वाचा : “औरंगाबादचं नामांतर करण्याची हिंमत भाजपात नाही”; संजय राऊतांचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “ढोंगी लोक…”

“शरद पवारांनी हिरवा झंडा दाखवल्यानंतर अजित पवार शपथविधी घेण्यासाठी गेले होते. आता ते नाही म्हणत आहेत. पण, शरद पवार आणि विचारांना सोडून जर ते शपथविधी घेत असतील; तर मोठी बंडखोरी केली होती. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री कसं केलं. ज्यांनी बंड केलं, त्यांना पदावर बसवलं. असं जर पक्षाचं धोरण असेल, तर इमानदारीने राहणाऱ्या आमदाराचं काय,” असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला.

हेही वाचा : उपमुख्यमंत्र्यांचे विश्वासू सचिव सुमित वानखेडे यांचा वारंवार होणारा वर्धा जिल्हा दौरा; रहस्य काय, वाचा…

“बंड करणाऱ्यांचं स्थान मोठं राहतं. नाना पटोले काँग्रेस सोडत भाजपात गेले. परत, काँग्रेसमध्ये आले. आता राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. बंडानंतर माणसाची किंमत वाढते, अशी चिन्ह आहेत,” असं विधान बच्चू कडूंनी केलं आहे.

Story img Loader