शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे सरकारमधील आमदारांत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आमच्या सरकारचा कार्यकाळ सात ते आठ महिने उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची नाही. म्हणून मला वाटतं, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा ‘जैसे थे’ स्थितीत सरकार चालवणं योग्य आहे.”

NCP Sharad Pawar faction state president MLA Jayant Patil has no statement regarding party defection
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या मौनाचा अर्थ काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली

हेही वाचा : देशात आणि राज्यात विरोधकांची एकजूट कायम राहील!; उद्धव ठाकरे यांना ठाम विश्वास, भाजपबरोबर जाण्याची शक्यता फेटाळली

“सध्या अडचण पालकमंत्र्यांची आहे. एका जिल्ह्याला एक पालकमंत्री असेल तर त्या जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावायला सोपं जातं. पण एकाच व्यक्तीकडे ८-९ जिल्हे असल्याने लोकांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. हे मात्र खरं आहे,” असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

शिंदे गटातील अनेक आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याबद्दल विचारले असता बच्चू कडूंनी म्हटले, “प्रभू श्री रामचंद्राबद्दल आमच्या मनात प्रचंड आस्था आहे. मला अयोध्येला जाण्याची इच्छा होती. पण, मार्केट समितीच्या निवडणुका असल्याने त्याची आखणी करत होतो. तसेच, रोगनिदान शिबिरही असल्याने अयोध्येला जात आले नाही.”

हेही वाचा : अदानी घोटाळय़ातील सत्य बाहेर येण्यासाठी ‘जेपीसी’ हेच प्रभावी अस्त्र; पृथ्वीराज चव्हाण यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर

“मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने नाराजी असण्याचे कारण नाहीच. २०२४ नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता आहे, इथेपर्यंत ठिक आहे. पण, बंडखोरी होईल, अशी अस्वस्थता नाही. आमच्यातही कधी नाराजीचा सूर येतो, पण कालांतराने जातो,” असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

Story img Loader