लोकप्रिय मराठी पुस्तक ‘कोल्हाट्याचं पोर’चे लेखक दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या आई आयुष्यभर भाड्याच्या घरात राहात आल्या आहेत. स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी त्या गेली अनेक वर्ष वणवण फिरत आहेत. त्यांचा मुलगा म्हणजेच डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर शांताबाई कोलमडून पडल्या. तब्बल ४० वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि लावणी करून आपल्या मुलाला लहानाचा मोठा करून डॉक्टर बनवणाऱ्या शांताबाईंचा वनवास अजून संपलेला नाही. मुलाच्या निधनानंतर त्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत.

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १,५०० रुपये मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच त्या त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. अनेकदा कलावंतांचं मानधनही वेळेवर मिळत नाही. घराचं भाडं द्यावं की पोट भरावं असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो.

laxmi in hospital
पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं केले थेट आगीशी दोन हात; आता मृत्यूशीही झुंज सुरू!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
shraddha kapoor on living with parents
“माझ्या आई-वडिलांनी माझं…”, श्रद्धा कपूरने कुटुंबियांबरोबर राहण्याचा अनुभव केला शेअर; म्हणाली, “आमच्या खोलीच्या दारावर…”
basti novel loksatta
तळटीपा : ये कैसी सरहदें…
marathi Books library in bus in thane news
मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ‘ग्रंथयान’ बंद होण्याच्या मार्गावर; पर्यायी म्हणून घरपोच सेवा उपलब्ध

हे ही वाचा >> ‘कोल्हाट्याचं पोर’ लिहिणाऱ्या किशोर शांताबाई काळेंच्या आईचा संघर्ष संपेना! घर नाही, मानधनही मिळत नसल्याची खंत

शांताबाईंना न्याय मिळणार

स्वतःचं घर मिळावं यासाठी त्या अधिकारी, मंत्री, आमदारांच्या कार्यालयांचे हेलपाटे मारत आहेत. त्यांना प्रत्येकाकडून केवळ आश्वासनं पण हक्काचं घर काही मिळालं नाही. परंतु आता शांताबाई काळे यांचा वनवास संपेल असं दिसतंय. कारण आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून शांताबाई काळे यांनी घर बांधून दिलं जाणार आहे. “कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे. शांताबाईंची अवस्था वाईट आहे. त्यांना सरकारने न्याय द्यायला हवा होता. अशा इतर कलाकारांकडे सरकारने डोळेझाक करू नये”, असं प्रहारचे पदाधिकारी म्हणाले.

Story img Loader