गेल्या महिन्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीतील काही शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच माजी मंत्री, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं वाटोळं होईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते गोंदियात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“शरद पवार भाजपाबरोबर गेले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचे मोठे वाटोळं होईल. पण, एकनाथ शिंदेंच्या कामात कोणी आडवं येऊ नये,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

हेही वाचा : “दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष बांधावा”, राज ठाकरेंच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर; म्हणाले…

‘शासन आपल्या दारी म्हणजे जनतेच्या नावाने सुरु केलेला नवीन जुमला आहे’, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबद्दल विचारल्यावर बच्चू कडू यांनी म्हटलं, “कधी न केल्याने सुप्रिया सुळेंना जुमला वाटत आहे.”

“राज्यात आज मजबूत सरकार”

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात आज एक मजबूत सरकार आहे. काही लोक दिवसा स्वप्न पाहतात. ‘दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे’, असं काही जण सांगतात.”

हेही वाचा : “मी पुन्हा येईन म्हटलं तर मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल”, पवारांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

“कोणीही आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तर…”

“होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे. पण, त्या खुर्चीचं रक्षण करण्यासाठी आमची नजर आहे. कोणीही आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम दोन उपमुख्यमंत्री करतील,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे”

Story img Loader