लोकसभा निवडणुकीत ‘मराठा’ मतपेढीची ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याचा निर्णय रद्द घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार उभे करण्यास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नकार दिला. मराठा समन्वयक गावोगावी गेले नाहीत. जे गेले त्यांनी चुकीची माहिती आणली. त्यामुळे अपक्ष उमेदवार उभं करणं शक्य नाही. तसे केल्यास उमेदवार निवडून येणार नाहीत, असं सांगत जरांगे यांनी राजकीय आखाडयातून माघार घेतली आहे. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक पक्ष आणि नेते प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुकीत मनोज जरांगे आपल्या बाजूने उभे राहिले तर मराठा समुदायाची मतं आपल्याला मिळतील असं अनेक उमेदवारांना आणि पक्षांना वाटतं. दरम्यान, आगामी निवडणुकीत अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा