अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसेच राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटातून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्यापही त्यांचा खातेवाटप झालेला नाही. याशिवाय आधीच मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले शिंदे गट आणि भाजपातील आमदारही नाराज असल्याची चर्चा होत आहे. अशातच सत्ताधारी पक्षाचे बहुतांश आमदार मुंबईत आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व आमदार मुंबईले गेले असताना अपक्ष आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू नागपूरमध्ये आहेत. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

बच्चू कडू म्हणाले, “माझी कार्यकर्त्यांबरोबर बैठक आहे. उद्या पारधी मेळावाही आहे. मुंबईत राहिलं तर मंत्रीपद मिळतं आणि गावी राहिलं तर मिळत नाही, असं नाही. शेवटी मंत्री असो अथवा नसो, काम तर करावंच लागतं. कामासाठीच मी परत आलो. सध्या खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल. सरकारमध्ये तीन इंजिन आहेत. त्यामुळे सरकार मजबूतही होऊ शकतं आणि बिघाडही होऊ शकतो.”

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?
Vijay Wadettiwar critized mahayuti government
वडेट्टीवार महायुतीवर मसंतापले,”हा काय सावळा गोंधळ सुरू आहे?
st scam loksatta news
एसटी निविदेत घोटाळा उघड, पुन्हा प्रक्रियेची समितीकडून शिफारस; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
Dhananjay Munde On Beed Guardian Minister Ajit Pawar
Beed Guardian Minister : पालकमंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट झाल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वतः बीड जिल्ह्याचं…”

“तीन इंजिनमुळे बिघाड होऊ नये म्हणून मुंबईत बैठका”

“तीन इंजिनमुळे बिघाड होऊ नये म्हणून मुंबईत बैठका सुरू असतील. या सगळ्या अचानक झालेल्या घटना आहेत. यात नकळतपणे अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे त्यात थोडा चिंतेचा विषय आहेच. कुणाला कोणतं खातं द्यायचं, कोणत्या जिल्ह्याला कुणाला पालकमंत्री करायचं या अनेक भानगडी आहेत. दिसताना सोपं वाटतं, पण आतून आम्ही पाहतो तेव्हा सर्व पोखरलेलं असतं,” असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं.

“तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा आहे?”

“तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा आहे?” या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, “मला कोणतीही अपेक्षा नाही. जशी परिस्थिती येईल त्यात आम्ही मार्गक्रमण करत असतो. मी अपेक्षा ठेऊन कधी चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंत्रीपदाबाबत गेल्या दोन-तीन दिवसात मला कोणताही फोन आलेला नाही.”

हेही वाचा : अजित पवारांच्या शपथविधीमुळे शिंदे गट, बच्चू कडू नाराज? मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “आम्हा सगळ्यांना…”

“हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांमधील फरक”

“सत्ताधारी पक्षाचे ९० टक्के आमदार मुंबईत आहेत. हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांमधील फरक आहे. इतके आमदार सांभाळताना नाराजी तर होणारच आहे. प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. सगळे आनंदी आहेत असं नाही. विरोधी पक्षातही सगळे आनंदी नाहीत आणि सत्ताधारी पक्षातही सगळे आनंदी नाहीत. त्यामुळे सगळे सुखी राहतील असा सुखी माणसाचा सदरा अद्याप तरी आलेला नाही,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.

Story img Loader