चिंचवड येथे दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी आज (२२ ऑगस्ट) या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमापूर्वी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी बच्चू कडू यांना केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेलं ४० टक्के शुल्क आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर बच्चू कडू म्हणाले, हे सरकार नामर्दासारखं वागतंय.

आमदार बच्चू कडू म्हणाले, फक्त सरकार टिकावं म्हणून ग्राहकांचा आणि कांदा खाणाऱ्यांचा विचार केला. परंतु, हे सरकार शेतकऱ्यांचा विचार का करत नाही? मी एनडीएमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. जेव्हा शेतमालाचा भाव वाढतो तेव्हा तुम्ही हस्तक्षेप करता, मग भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही?

Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Despite the written assurance by cm eknath shinde Dhangar brothers persisted in their hunger strike
मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतरही धनगर बांधव उपोषणावर ठाम
PM Narendra Modi, Wardha,
पंतप्रधान मोदी २० ला वर्धेत! देशभरातून २० हजार ‘विश्वकर्मा’ हजेरी लावणार
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
vasai bjp aggressive
कारवाई होत नसल्याने भाजप कार्यकर्ते हवालदिल; केंद्रात, राज्यात सत्ता, मात्र वसईत कुणी दाद देईना
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
The Kalyan Court rejected the bail application of Shiv Sena Vaman Mhatre badlapur
बदलापूर: वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला

बच्चू कडू म्हणाले, मुळात या सरकारला निर्यात शुल्क लावण्याची काहीच गरज नव्हती. हे सरकार ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था आज करून ठेवतंय, एवढी नालायकी? का तर अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडलं होतं म्हणून. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मेक इन इंडिया, मेड इन इंडिया असं धोरण आहे. मग शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला सफरचंदाइतका भाव मिळेल ना. या सरकारने आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. मग आम्ही एकही जागा न मागता पूर्ण ताकदीने एनडीएला पाठिंबा देऊ, पायात चप्पल न घालता फिरू.

दरम्यान, कांद्याचा विषय अधिक गंभीर झाल्याने आपण सरकाविरोधात आंदोलन करणार असल्याचं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांनाही सुनावलं. बच्चू कडू म्हणाले, कांद्याचे किंवा शेतमालाचे भाव वाढल्यावर मीडिया त्याच्या बातम्या दाखवते, मग भाव कमी झाल्यावर का दाखवत नाही.

हे ही वाचा >> कांदा प्रश्नावर मुंडे दिल्लीत, तर फडणवीसांचा जपानहून फोन; महायुतीत श्रेयवादाची लढाई? अजित पवार म्हणाले…

आमदार बच्चू कडू म्हणाले, कधीकधी हे सरकार नामर्दासारखं वागतं. ही सरकारची नामर्दानगी आहे. सत्ता टिकावी म्हणून सरकारने केवळ ग्राहकांचा विचार केला. सरकारने खाणाऱ्यांचा विचार केला पण हे सरकार पिकवणाऱ्याचा विचार का करत नाही? सरकारने ही नालायक प्रवृत्ती सुधारली पाहिजे.