Bacchu Kadu : ई-रिक्षा वाटपानंतर त्या तत्काळ नादुरुस्त झाल्याने बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीतून त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. पहिल्याच दिवशी ई-रिक्षा बंद पडल्याने बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
राज्यात इ-रिक्षाचे वाटप करण्यात आले आहे. परंतु, पहिल्याच दिवशी या इ रिक्षा बंद पडल्याची तक्रार बच्चू कडूंना प्राप्त झाली. संभाजीनगरमधील गेस्ट हाऊसमध्ये काही जणांनी बच्चू कडूंकडे ही तक्रार केली. त्यावेळी तिथे काही अधिकारीही उपस्थित होते. तक्रारदार त्यांचे प्रश्न मांडत असतानाच बच्चू कडूंनी त्यांच्या कानशिलात लगावली.
बातमी अपडेट होत आहे
First published on: 08-08-2024 at 17:10 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachu kadu bit the social welfare officer after e rikshaw got error in the first day sgk