शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शनिवार संध्याकाळपासून रत्नागिरी जिल्ह्य़ात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, हॉटेल्स, सर्व प्रकारचे व्यवसाय या बंदमध्ये सहभागी झाले होते. फक्त पेट्रोल पंप बंदमधून वगळण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकही अतिशय कमी होती. जिल्हाभरातील शिवसेनेचे प्रमुख नेते व कार्यकर्ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाले. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जागोजागी फलक लावण्यात आले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-11-2012 at 02:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray death following ratnagiri shout down