शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शनिवार संध्याकाळपासून रत्नागिरी जिल्ह्य़ात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, हॉटेल्स, सर्व प्रकारचे व्यवसाय या बंदमध्ये सहभागी झाले होते. फक्त पेट्रोल पंप बंदमधून वगळण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकही अतिशय कमी होती. जिल्हाभरातील शिवसेनेचे प्रमुख नेते व कार्यकर्ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाले. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जागोजागी फलक लावण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray death following ratnagiri shout down