अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह शिंदे-फडणवीसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पण, अजित पवारांच्या बंडाची कुणकुण लागली होती, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.

“काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. अजित पवार हे सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे, हे जाणवत होते,” असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

School Bus
School Bus Fare : पालकांसाठी महत्त्वाची बातमी; शाळा बस शुल्क ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; संघटनेने सरकारसमोर ठेवली ‘ही’ एकच अट!
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Three lakh rupees stolen from dead singers bank account
मृत गायकाच्या बँक खात्यातील तीन लाखांची रक्कम हडपली
Movement to resume Kisan Special Train services
किसान विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली
rahul solapurkar on chhatrapati shivaji maharaj
Rahul Solapurkar: छत्रपती शिवरायांबाबतच्या ‘त्या’ विधानावर राहुल सोलापूरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “लाच हा शब्द…”
anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
Manik Sangle and Urmila Yadav caught red handed while taking bribe
सहकारी संस्थांचे उपनिबंधक माणिक सांगळे व कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना लाच घेताना रंगेहात पकडले
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : दावोसमध्ये भारतीय कंपन्यांशीच करार; फडणवीसांनी स्पष्टच सांगितली यामागची कारणमीमांसा
devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!

बाळासाहेब थोरात म्हणाले, “करोनाच्या संकटात आम्ही चांगल्या पद्धतीने अडीच वर्षे काम केलं. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असे आम्हाला वाटत होते. पण, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मोठ्या संख्येने आमदार घेऊन बाहेर पडले, तेव्हा धक्का बसला. या बंडाचा वास सुद्धा आला नाही, याचं आम्हाला आश्चर्य वाटलं.”

हेही वाचा : “…अन् हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते”, ठाकरे गटाची पंतप्रधानांवर टीका

“आता पुन्हा एक वर्षानंतर नवा धक्का मिळाला आहे. काहीतरी होणार असे वाटत असताना, अचानक अजित पवार सरकारबरोबर जात उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांकडील आमदारांचा आकडा अद्याप कळू शकला नाही. काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. कारण, महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

“त्यावेळी झालेल्या सर्वेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या ३८ जागा आणि विधानसभेला १८० जागा मिळत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे वाटायचं की भाजपाला आघाडी तोडण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा कुठूनतरी सिग्नल येत असायचे. ईडी आणि अन्य कारवाया वाढल्या हे सुद्धा सिग्नल होते,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा : “आम्ही जर बोललो तर पळता भुई थोडी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

“अजित पवार सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे. हे जाणवत होते. अजित पवारांनी २०१९ सालीही शपथ घेतलीच होती. भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी ही आघाडी तोडण्याची गरज वाटत असणार. त्यातून काही गोष्टी घडतील हे वाटत होते. कारण, अजित पवारांची काम करणे आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता, हे घडणार याची कुणकुण लागली होती,” असं बाळासाहेब थोरतांनी म्हटलं आहे.

Story img Loader