अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांना समर्थन देणाऱ्या आमदारांचा आकडा अद्याप समोर आला नाही. पण, या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाची पुन्हा उभारणी करू शकतील का? असा प्रश्न उभा राहिला आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची पुर्नंबांधणी करु शकतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “शरद पवार राज्यात फिरून लोकसभा आणि विधानसभेला चांगला निकाल आणतील. शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी पक्ष उभा राहिल. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार निवडून येतील.”

Rahul Gandhi Upset With Maharashtra Congress Leaders?
Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…”
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Sujay Vikhe Patil On Nilesh Lanke
Sujay Vikhe Patil : नगरमध्ये राजकारण तापलं, सुजय विखेंचा निलेश लंकेंना इशारा; म्हणाले, “टायगर अभी…”
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : वेगळी भूमिका घेण्याबाबत अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मी शरद पवारांना…”
suraj chavan and abhijeet sawant
“त्याने मला खूप…”, सूरज चव्हाणचे अभिजीत सावंतबद्दलचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “तू आहे तसा…”
Harshvardhan Patil : “सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग”, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांची कबुली
Sanjay Raut, Harshvardhan Patil
Sanjay Raut : “हर्षवर्धन पाटील शांत झोपेसाठी भाजपात गेलेले, आता मविआत आल्यावर…”, संजय राऊतांची कोपरखळी
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा : “…तेव्हाच सिग्नल मिळाला होता”, अजित पवारांच्या बंडावर थोरातांचं मोठं विधा

शरद पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन राजकारण करावे, असं वाटतं का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की, “शरद पवार यांनी स्वतंत्रपणे राजकारण केलं आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा विचार वेगळा नाही. फक्त दोन पक्ष आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आज ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहे, त्यातूनच यश मिळवू.”

हेही वाचा : “…अन् हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते”, ठाकरे गटाची पंतप्रधानांवर टीका

“काहीतरी होणार असे वाटत असताना, अचानक अजित पवार सरकारबरोबर जात उपमुख्यमंत्री झाले. काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. कारण, महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती. त्यावेळी झालेल्या सर्वेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या ३८ जागा आणि विधानसभेला १८० जागा मिळत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे वाटायचं की भाजपाला आघाडी तोडण्याशिवाय पर्याय नाही,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.