राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी ( १६ एप्रिल ) ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सराकरमधील मंत्री उपस्थित होते. हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात पार पडला. पण, या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.

‘महाराष्ट्र भूषण’च्या या पुरस्कार सोहळ्याला आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी ४२ अंश सेल्सियसच्या तापमानात उपस्थित होते. रणरणत्या उन्ह्यामुळे अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. त्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut and Nana Patole
Mahavikas Aghadi : नाना पटोले अन् संजय राऊतांमधील वाद मिटला? बैठकीनंतर एकत्र येत भाजपावर केला गंभीर आरोप; म्हणाले, ‘मोठं षडयंत्र…’
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
devendra fadnavis said about baba siddiquis murder
देवेंद्र फडणवीस म्हणतात,‘बाबा सिद्दिकींची हत्या ही दुर्दैवी घटना; मुख्य सूत्रधार…’
Baba Siddique murder in Mumbai
Baba Siddique : “बाबा सिद्दीकींची हत्या म्हणजे काँट्रॅक्ट किलिंग, आता पोलिसांना…”; छगन भुजबळ यांचा आरोप
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
Devendra Fadnavis Post About Ratan Tata
Ratan Tata Death : “रतन टाटांच्या निधनाने देशाने मानवता आणि दातृत्वाचा मानबिंदू हरपला”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
What Nitin Gadkari Said About Ratan Tata?
Ratan Tata Death : “देशाने दूरदर्शी आणि दयाळू मार्गदर्शक गमावला”, रतन टाटांच्या निधनानंतर नितीन गडकरींची पोस्ट

हेही वाचा : अजित पवार आणि काँग्रेसचे आमदार फुटणार? बाळासाहेब थोरात स्पष्टीकरण देत म्हणाले…

“हा प्रसंग दुर्दैवी आहे. कार्यक्रमाचं नियोजन करताना वेळ, सध्याच्या तामपानाचा विचार करण्यात आला नाही. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्रद्धेपोटी लोक आले. थोडीच सरकारसाठी येणार होते. सरकार म्हणून बारकावे आणि नियोजन करू शकत नसतील, तर हे फार मोठं अपयश आहे. याबाबत ज्यांनी निर्णय घेतले ते या घटनेला जबाबदार आहेत.”

हेही वाचा : “अजित पवार काही आमदार घेऊन बाहेर पडत असतील तर…”, गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केलं मत

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या वेळेतच कार्यक्रम घेतला, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. याबद्दल विचारल्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी कार्यक्रम करणारे सरकार असते. आप्पासाहेबांनी वेळ दिला असला, तरी ही वेळ योग्य नसल्याचं सरकारच्या वतीने सांगायला हवं होतं.”