काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपामध्ये मी प्रवेश केला तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी एकट्याने खिंड लढवू अशी गर्जना केली होती. मात्र, आता त्यांनी खिंड सोडून पळ काढला. असा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना लगावला होता.

यावर संगमनेरमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी, “अगोदर हे पळाले, नंतर मी खिंड लढवली. २०१९ मध्ये अगोदर हे पळाले. ते खरंतर विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्रातील काँग्रेस सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी त्या पद्धतीने महाराष्ट्राची काँग्रेसच तर सांभाळली नाही. परंतु जेव्हा लढण्याची वेळ आली त्यावेळी ते पळून गेले. आता ते माझ्यावर कशाला आरोप करत आहेत. अशा शब्दांमध्ये विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.”

rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
कोल्हापूर येथील खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
Solapur crime news
लातूरच्या अल्पवयीन मुलीस जन्मदात्या आईनेच विकून लग्न लावले, माढ्यातील धक्कादायक प्रकार

याशिवाय, “या सर्व पक्षांतर्गत चर्चा असतात आणि या अखंडपणे सुरू असतात, कोणत्याही पक्षात सुरूच असतात. फक्त आमच्या या चर्चेला तुम्ही खूपच चांगली प्रसिद्धी दिली. तुमचे आभार मानले पाहिजे. जे झालं त्याबाबत माझ्या ज्या भावना होत्या त्या मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या होत्या. त्यांनी त्या पद्धतीने दखल घेतली आहे. एच के पाटील काल आले होते आमची चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या पक्ष पुढे जाण्यासाठीच आहे.” असंही थोरात यांनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकुल वातावरण आज आहे. या वातावरणात ज्या निवडणुका होतील त्या महाविकास आघाडीला चांगलं यश देणाऱ्या ठरतील.” असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

काय म्हणाले होते विखे पाटील –

“२०१९ मध्ये काँग्रेस वाचवण्यासाटी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असं सांगणारे व एकाकी खिंड लढवणार असं म्हणत मिरवणारे आता का हतबल झाले? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानलं आहे.” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते.