नागपूर : तेलंगणपेक्षा महाराष्ट्रात नैसर्गिक संपदा जास्त आहे. पण, तरीही येथे शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. ही स्थिती बदलण्यासाठी आमचा पक्ष महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार आहे. सत्ता प्राप्त केल्यानंतर येथे तेलंगणमधील कृषी प्रारूप लागू करू, त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू आणि नंतर मध्य प्रदेशात पक्षविस्तार करू, अशी घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी  गुरुवारी नागपुरात केली.

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात राव बोलत होते. ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृह तुडुंब भरले होते. तत्पूर्वी राव यांनी वर्धा मार्गावर पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले.

BJP first list of candidates for assembly elections 2024 print politics news
भाजपची पहिली यादी आज; महायुतीच्या जागावाटपाचा तिढा केंद्रीय नेतृत्वापुढे
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Raj Thackeray
Raj Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “गेली ९९ वर्ष संघाने…”
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
amit shah in kolhapur
महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा
bjp, maharashtra assembly
“महाराष्ट्र जिंकल्यास देश जिंकल्याचा संदेश”, अमित शहा यांचे कार्यकर्त्यांना एकजूट राखण्याचे आवाहन
Congress national in-charge Ramesh Chennithala said Now only one target to change Maharashtra power
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी चेन्नीथला म्हणाले, “आता एकच लक्ष्य, महाराष्ट्र सत्ताबदल”

आपल्या देशात सुपीक भूप्रदेश, मुबलक पाणी, कोळसा आणि सर्वाधिक जनसंख्या आहे. पण, स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाले तरी अजूनही पाण्याची टंचाई आहे. शहरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. दिल्लीसारख्या ठिकाणी चोवीस तास वीज मिळत नाही. अनेक भागात कुपोषणाची समस्या आहे. ही स्थिती बदलण्यासाठी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) संपूर्ण देशात परिवर्तन करण्याचे ध्येय घेऊन निघाली आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. येथे सर्व स्तरावरील निवडणुका लढवण्यात येतील आणि त्यानंतर मध्यप्रदेशात प्रवेश केला जाईल, असेही राव म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपचे नाव न घेता या पक्षाचा समाचार घेतला. धर्म, जातीच्या नावाने समाजात फूट पाडून निवडणुका जिंकल्या जात आहेत. परंतु हा विजय केवळ त्या नेत्याचा, त्या पक्षाचा आहे. त्याचा लोकांना काहीच लाभ नाही. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला आणि तेथे काँग्रेस पक्षाची सत्ता आली. म्हणजे नेते बदलले, पक्ष बदलला, पण जनतेला त्या सरकारकडून आशा-आकांक्षा पूर्ण होतील, असे अजिबात वाटत नाही, अशी टीकाही के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसवरही केली.

तेलंगणात शेतकरी आत्महत्या शून्यावर

नांदेड येथे आमची सभा झाली, तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमचे महाराष्ट्रात काय काम, असे म्हटले होते. त्यावर मी त्यांना तेलंगणचे कृषी प्रारूप स्वीकारा, महाराष्ट्रातून निघून जाईन, असे उत्तर दिले होते, असे के. चंद्रशेखर राव म्हणाले. तेलंगणमध्ये तलाठी हे पद रद्द केले. सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या. शेतकऱ्यांना आता सात-बारासाठी कुठे जावे लागत नाही. शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज दिली. शेतकरी जे कोणते उत्पादन घेतील ते सर्वच्या सर्व राज्य सरकार खरेदी करते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचा पाच लाखांचा विमा सरकारने काढून दिला आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शुन्यावर आल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.