लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झालं. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. या दिग्गज नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे आणि जालना मतदारसंघामधून रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाचा दौरा सुरू करत कामाला सुरुवात केली आहे.

आता पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा नेते, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ‘आपल्याला पक्षाने सरपंच होण्यास सांगितले तरी आपण सरपंच होऊ’, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

Cm Eknath Shinde in Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार? मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महासंग्राम रंगणार!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
sharad pawar loyalist jayant patil criticized amit shah narendra modi
मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे  घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Vijay Wadettiwar, Congress MP, Chandrapur,
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन
maharashtra minister chandrakant patil come down on road to fill potholes in city pune
चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘कोथरूड’मध्ये ‘खड्डे’ बुजविण्याची दक्षता; हे सर्व निवडणुकीसाठी असल्याची विरोधकांची टीका

हेही वाचा : संजय राऊत यांचं मोठं विधान, “नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री”

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“मी ३५ वर्षे आमदार, खासदार राहिलो. आता पक्षाने जर मला गावचा सरपंच होण्यास सांगितलं तर मी गावचा सरपंच होईन. कारण गावचा सरपंच झालं तर गावचा विकास तरी करता येईन”, असं रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

मतदारसंघाचा दौरा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. मात्र, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे महायुतील मोठा धक्का बसला. यानंतर आता महायुतीच्या जागा का कमी निवडून आल्या? यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. तसेच भाजपाच्यावतीने महाराष्ट्रभर चिंतन बैठकी सुरु आहेत. या अनुषंगाने रावसाहेब दानवे हे देखील मराठवाड्यातील काही मतदारसंघात दौरे करत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसेच या माध्यमातून विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा देखील घेतला जात आहे.

रावसाहेब दानवेंच्या विरोधात कोण होतं?

लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून रावसाहेब दानवे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते डॉ.कल्याण काळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना धक्का बसला.