‘शिवसेने’चं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्ष चिन्ह गोठण्याचा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने शनिवार ( ८ ऑक्टोंबर ) घेतला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नव्यानं उभारी घेत असलेला शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाणा’बाबत दिलेला निर्णय सर्वांना धक्का देणारा आहे. या निर्णयातून सध्याच्या लोकशाहीचं भवितव्य काय हा प्रश्न निर्माण होतो. देशाची संसदीय लोकशाही प्रणाली राहणार की? हुकूमशाही, एकाधिकारशाही येणार. इंदिरा गांधी यांनी हिंमतीने तेव्हा आणीबाणी जाहीर केली होती. मात्र, सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरु आहे,” अशी टीका त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर केली.

PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
The proposed Bill had proposed to change the composition of Waqf Boards in states. (Photo: X/jagdambikapalmp)
Waqf Borad : “वक्फ विधेयकामुळे मुस्लिमांचे हक्क कमकुवत होतील आणि…”, विरोधी पक्षातील सदस्यांची ‘त्या’ अहवालावर नाराजी
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
girish mahajan chhagan bhujbal l
छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? गिरीश महाजन म्हणाले…

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना दिलासा! “शिवसेना नाव वापरता येणार पण…,” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं

“मी माझ्या व्यथा मांडू कुठे”

पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांंची कविता म्हणून दाखवत भास्कर जाधवांनी म्हटलं, “ही न्यायव्यवस्था रखेल झाली, संसद देखील षंढाची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कुठे. येथील न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला आहे.

Story img Loader