ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर गंभीर टीका केली जात आहे. आमदार भास्कर जाधव यांनीही गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केलेल्या भाषणात कोणते चिथावणीखोर वक्तव्य होते, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. मात्र गुन्हा दाखल झाला असेल तर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> समता पार्टीच्या ‘मशाल’ चिन्हावरील दाव्यानंतर उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय? भास्कर जाधव म्हणाले “हे चिन्ह आम्ही…”

Man gets life sentence for pouring kerosene on wife and setting her on fire
पुणे : पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या एकाला जन्मठेप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
uday samant reaction marathi and non Marathi dispute over satyanarayan puja
मराठी भाषेबाबत जर कोणी अटकाव करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे : उदय सामंत
shreya talpade and aloknath fir
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीच्या प्रकरणात आले नाव; काय आहे प्रकरण?
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!

शिवसेनेचे काम करायचे म्हणजे निखाऱ्यावरून चालावे लागते, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे निखाऱ्यावरून चालत असताना चटके बसणारच आहेत. आम्हाला फार काही चिंता नाही. तेव्हा जे भाषण झाले, त्यामध्ये काय चिथावणीखोरपणा आहे, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. तरीदेखील त्यांनी असा काही गुन्हा दाखल केला असेल, तर आम्ही त्याला कायद्याने उत्तर देऊ. आता महाराष्ट्रात गद्दारीच्या विरोधात जो राग निर्माण झाला आहे. जो आगडोंब उसळला आहे, तो अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून थांबणार नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा >>> “आमची मशाल ४० मुंडक्यांच्या रावणाला…”; मनिषा कायंदेंची शिंदे गटावर जोरदार टीका

आमच्यातील काही ठराविक लोकांवर गुन्हे दाखल करून हा वणवा विझणार नाही. हा विचारांचा वणवा दिवसागणिक वाढत जाईल. त्यामुळे असे गुन्हे दाखल करताना त्यांनी काही विचार करणे गरजेचे आहे. आज त्यांच्या बाजूला असलेले लोक उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही-बाही बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात समन्यायी प्रमाणात न्याय दिला पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली.

Story img Loader