लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ठाकरे सरकारनं लोकायुक्त कायदा करणार असल्याचं सांगितलं होतं. पण, कायदा केला नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत “अण्णांना आता ठाकरे दिसले का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

अण्णा हजारे काय म्हणाले?

“लोकायुक्त कायदा विधानपरिषदेत मंजूर झाला. हा क्रांतीकारण निर्णय आहे. फक्त नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे. वेळ पडली तर ८८ व्या वर्षी हा कायदा समजवण्यासाठी महाराष्ट्रात फिरेल. कारण, भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण केला पाहिजे,” असं अण्णा हजारेंनी म्हटलं.

PM Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात संविधान घेऊन…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

“ठाकरे सरकारनं लोकायुक्त कायदा करणार असल्याचं सांगितलं होतं. पण, हा कायदा केला नाही. ठाकरे सरकारला हा कायदा नको होता. देवेंद्र फडणवीसांनी कायदा करण्यास वेळ घेतला. मात्र, कायदा केला,” असं कौतुक अण्णा हजारेंनी केलं आहे.

यावरून भास्कर जाधवांनी अण्णा हजारेंना टोला लगावला आहे. “अण्णा कधी जागे झाले? २०१४ साली भाजपाचं सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का?” असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारेंना विचारला आहे.

Story img Loader