माजी मंत्री शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंबरोबर शिवसेना खासदर अनिल देसाई, खासदार प्रियंका चर्तुवेदी हे सुद्घा उपस्थित होते. आदित्य ठाकरे बिहारला पोहचताच पटना येथे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी पोहचले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली आहे.

आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पहिल्यांदाच तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे एकत्र आल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. दरम्यान, या भेटीवरून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. “महाराष्ट्र संभाळता आला नाही आणि बिहारला चालले आहेत. पहिल्यांदा आपलं घर संभाळात आले नाही, आणि आमच्यावर गद्दारीचे आरोप करण्यात करता. खरे गद्दार तुम्ही आहात,” अशी टीका भावना गवळी यांनी केली आहे.

Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
sushma andhare replied to amurta fadnavis
Sushma Andhare : “त्या आमच्या लाडक्या भावजय, पण कधी-कधी…”; सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीस यांच्यावर पलटवार!
Ruta Awhad Sparks Controversy osama bin laden apj abdul kalam
Video: “ओसामा बिन लादेन दहशतवादी म्हणून जन्मला नाही, त्याला समाजानं…”, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीकडून अब्दुल कलाम आणि लादेन यांची तुलना
CM Eknath Shinde his party leaders turning their backs on Mathadi Mela become topic of discussion
नवी मुंबई : माथाडी राजकारणाला शिंदे गटाची बगल? मराठाबहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
eknath shinde mathadi workers
माथाडी राजकारणाला शिंदे सेनेची बगल ? मराठा बहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
Nitin Gadkari Inauguration ceremony of development works held at Karvenagar Attendance of BJP workers is low
गर्दी जमविण्यासाठी भाजप ‘दक्ष’; गडकरींच्या सभेला अल्प उपस्थितीनंतर पदाधिकाऱ्यांना जाग

हेही वाचा : “…तर माझा जीवही गेला असता”, ‘गद्दार, गद्दार’ घोषणेनंतर भावना गवळींचा आरोप; राऊत, देशमुखांच्या अटकेची मागणी

“आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलो. त्यामुळे भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. त्यामुळे खरे गद्दार कोण आहे, हे सर्वांना दिसलं आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून बाळासाहेबांचे विचार विकले नाही. आम्ही खरी शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन निघाले आहोत. म्हणून यांच्या पोटात दुखत आहे,” असेही भावना गवळी यांनी म्हणाल्या. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा : “प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा करण्यास तयार”, अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

“लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची…”

दरम्यान, भेटीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, “ये दोस्ती आगे चलती रहेगी. संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती. ही राजकीय भेट नाही, प्रत्येकवेळी राजकीय भेट म्हणून बघू नका. फक्त तेजस्वी यादव यांच्या कामामुळे ही भेट घेतली आहे. पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली,” असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.