शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत खासदार भावना गवळी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भावना गवळींना लक्ष्य केलं होतं. याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना नात्यातील महत्व कळत नाही, असं टीकास्र भावना गवळींनी सोडलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“गेल्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतं का? पंतप्रधानांना राखी बांधतानाचा एकच फोटो आला होता. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडीची चौकशी थांबली,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Draupadi murmu and sonia gandhi
Rashtrapati Bhavan : “राष्ट्रपती थकलेल्या नाहीत”, सोनिया गांधींच्या टीकेनंतर राष्ट्रपती भवनातून प्रत्युत्तर!
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

हेही वाचा : “मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का?” उद्धव ठाकरेंच्या टीकेला बांगर प्रत्युत्तर देत म्हणाले…

“उद्धव ठाकरे यांना नात्याचं महत्वं कळत नाही”

यावर बोलताना भावना गवळी म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांनी पवित्र नात्यावर सतत वक्तव्य केलं आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांना नात्याचं महत्वं कळत नसेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भांडणंही कधीच संपलं असतं. पण, उद्धव ठाकरेंनी त्यावर निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबरही उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली.”

“उद्धव ठाकरेंनी कोणाला चांगली वागणूक दिली नाही”

“उद्धव ठाकरे यांना कधी नातं टिकवता आलं नाही. म्हणून ते सतत पवित्र बंधनावर बोलत असतात. उद्धव ठाकरे यांनी कधीही कोणाला चांगली वागणूक दिली नाही. ४० आमदार आणि १३ खासदार सोडून का गेले? यांचं चिंतन उद्धव ठाकरे यांनी केलं नाही,” असं टीका भावना गवळी यांनी केली.

हेही वाचा : “दाढीवाल्याने भाजपाची पावडर लावली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…

“…म्हणून या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये”

“मी पाचवेळा खासदार म्हणून निवडून आली. माझ्या मतदारसंघात २४ वर्षापासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवत आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांना राखी बांधली आहे. पंतप्रधान मोदींनाही राखी बांधत आहे. त्यामुळे या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी कधीही बंधन पाळलं नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा हल्लाबोल भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Story img Loader