शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत खासदार भावना गवळी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भावना गवळींना लक्ष्य केलं होतं. याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना नात्यातील महत्व कळत नाही, असं टीकास्र भावना गवळींनी सोडलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“गेल्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतं का? पंतप्रधानांना राखी बांधतानाचा एकच फोटो आला होता. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडीची चौकशी थांबली,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

samrudha Konkan Association Swarajyabhoomi ,
रत्नागिरी : कोकण विकासासाठी समृद्ध कोकण संघटना स्वराज्यभूमीचे आंदोलन
Ramdas Athawale
Ramdas Athawale : “…तर माझ्याऐवजी प्रकाश आंबेडकरांना मंत्री…
EY toxic culture controversy ashneer grover
Ashneer Grover EY story: “एक कोटी पगार; तरीही पहिल्याच दिवशी पळालो” अशनीर ग्रोवरनं सांगितला EY कंपनीतील धक्कादायक अनुभव
EY India has denied allegations of "work pressure" after Anna Perayil's mother made the claims
EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या ॲनाच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ती रात्री साडेबारापर्यंत…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हा विरोधकांचा अपप्रचार, ते आता तोंडावर पडलेत”, ‘रीन्यू पॉवर’च्या निवेदनाचा दाखला देत फडणवीसांचं प्रत्युत्तर
e-voter registration, electricity payment, Satara,
सातारा : वीज देयकात खाडाखोड करून ४६२ ई- मतदार नोंदणी अर्ज, ‘सतीश सर’ नामक व्यक्तीवर गुन्हा
sanjay raut nana patole
Sanjay Raut : लोकसभेतील यशानंतर काँग्रेस विधानसभेला एकटी लढणार? राऊत सूचक वक्तव्य करत म्हणाले, “आत्मविश्वास वाढलाय, पण…”
The death of EY employee Anna Sebastian Perayil sparked outrage over company work conditions
EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईसाठी कंपनीच्या अध्यक्षांचं पत्र, म्हणाले, “मी ही एक बाप…”
Jalna Bus Truck Accident News in Marathi
Jalna Accident : जालन्यात बस-टेम्पोचा भीषण अपघात; सहा ठार, १८ जण जखमी

हेही वाचा : “मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का?” उद्धव ठाकरेंच्या टीकेला बांगर प्रत्युत्तर देत म्हणाले…

“उद्धव ठाकरे यांना नात्याचं महत्वं कळत नाही”

यावर बोलताना भावना गवळी म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांनी पवित्र नात्यावर सतत वक्तव्य केलं आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांना नात्याचं महत्वं कळत नसेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भांडणंही कधीच संपलं असतं. पण, उद्धव ठाकरेंनी त्यावर निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबरही उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली.”

“उद्धव ठाकरेंनी कोणाला चांगली वागणूक दिली नाही”

“उद्धव ठाकरे यांना कधी नातं टिकवता आलं नाही. म्हणून ते सतत पवित्र बंधनावर बोलत असतात. उद्धव ठाकरे यांनी कधीही कोणाला चांगली वागणूक दिली नाही. ४० आमदार आणि १३ खासदार सोडून का गेले? यांचं चिंतन उद्धव ठाकरे यांनी केलं नाही,” असं टीका भावना गवळी यांनी केली.

हेही वाचा : “दाढीवाल्याने भाजपाची पावडर लावली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…

“…म्हणून या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये”

“मी पाचवेळा खासदार म्हणून निवडून आली. माझ्या मतदारसंघात २४ वर्षापासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवत आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांना राखी बांधली आहे. पंतप्रधान मोदींनाही राखी बांधत आहे. त्यामुळे या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी कधीही बंधन पाळलं नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा हल्लाबोल भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.