महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील बदलतं राजकारण आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. तसेच त्यांची राजकीय दिशा काय असेल याचंही सुतोवाच केलं आहे. ते दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून गुरुवारी (१३ जुलै) रत्नागिरीतील चिपळून येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “आपण आपला विचार लोकांपर्यंत का पोहचवायचं म्हणत आहोत. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी पदानुसार बोलण्यापेक्षा मनाने एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. आज चिपळूणमध्ये शाखेचं उद्घाटन झालं. इथे अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी येऊन गेली. जोरदार कामाला सुरुवात झाली आहे.”

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

“मला तडजोड करावी लागली, तर मी घरात बसेन”

“एखाद्या पदावर बसल्यावर काम झालं पाहिजे. पक्ष सांगेल ते काम करावं लागेल, अन्यथा पदावर राहता येणार नाही. मला तडजोड करावी लागली, तर मी घरात बसेन, तडजोड करणार नाही. राज्यात जो व्यभिचार सुरू आहे, तो मी करणार नाही,” असं महत्त्वाचं विधान राज ठाकरेंनी केलं.

हेही वाचा : Video: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे का? संजय राऊत म्हणाले, “अनेक दगडांवर पाय ठेऊन…”

“लोकसभेची निवडणूक का लढवायची?”

लोकसभेची निवडणूक का लढवायची असा सवालही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केला. सद्यपरिस्थितीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी १५ दिवसात मेळावा घेणार आहे. त्यातच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करेन. मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या मनातील संताप बाहेर काढणार आहे.”

Story img Loader