औरंगाबाद : “राज्यसभा निवडणुकीत खेळला गेलेला जुना डाव हा विरोधकांना समजला असल्याने ‘शतरंज के बादशाह’ देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत आता नवा डाव टाकणार आहेत,” असं मोठं वक्तव्य भाजपा नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. तसेच विधान परिषदेत भाजपा आपले पाचही उमेदवार जिंकून आणेल, असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, “भाजपाने विचारपूर्वक विधान परिषद निवडणुकीत पाच उमेदवार दिले आहेत. याआधी ‘शतरंज के बादशाह’ देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजची खेळी करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवलं. आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही. आता आम्ही वेगळा डाव टाकणार आहोत. कारण आता या तिन्ही पक्षांना आमचा आधीचा डाव माहिती झाला. ते आता त्याच रस्त्याने जातील. त्यामुळे आम्ही वेगळा मार्ग काढून पुन्हा आमचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार जिंकवणार आहोत.”

marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Chhagan Bhujbal On Amit Shah
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”

“आमचा डाव एकनाथ खडसे यांनाच नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभूत करण्याचा आहे. नावाला नाही, तर पक्षाला हरवणार आहे, मग त्यात माणसं येतीलच,” असंही दानवे यांनी सांगितलं.

“खडसेंना उमेदवारी न दिल्यास बिनविरोधची चर्चा”, रावसाहेब दानवे म्हणाले….

एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीबाबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “एकनाथ खडसे यांना विधान परिषद उमेदवारी न दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून त्यांना देण्यात आला नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि मी बुधवारी (१५ जून) सोबत होतो.”

“आमची या विषयावर चर्चा झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिला नाही. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आम्ही का कुणाचं नाव सुचवावं,” असंही दानवेंनी नमूद केलं.

“पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढावा”; जलील यांच्या वक्तव्यावर दानवेंचं प्रत्युत्तर

रावसाहेब दानवे यांनी पंकजा मुंडे यांची नाराजी आणि जलील यांनी त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्याबाबत केलेलं आवाहन यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राजकारणात दुसऱ्यात कसा खोडा घालता येईल असा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. इम्तियाज जलील म्हटल्यानंतर पंकजा मुंडे त्याला प्रतिसाद देतील असं नाही.

हेही वाचा : “मांजर पिलं उचलून फिरते तसं शिवसेना आमदार घेऊन फिरते”, दानवेंच्या टीकेवर सुभाष देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“पंकजा मुंडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे भाजपाचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे पंकजा मुंडे कुणाच्याही बोलण्यावर काही निर्णय घेतील असं नाही. त्या पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य वेळी त्यांचा विचार करेल याची मला खात्री आहे,” असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

Story img Loader