सांगली : शेतात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून वन्य प्राण्याची शिकार केल्याचे आढळल्यास कामगारासोबतच संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याात येईल, असा इशारा तासगाव तालुक्यातील सावळज ग्रामपंचायतीने दिला आहे.

द्राक्ष बागांची फळछाटणी, तसेच अन्य कामे आता सुरू होत आहेत. या कालावधीत कामासाठी नाशिकसह बिहारमधून मोठ्या प्रमाणात मजूर या भागात दर वर्षी येतात. मात्र, या कामगारांकडून स्थानिक पातळीवर पक्षी, ससे, घोरपडे, मोर आदी वन्य प्राण्याची मांसासाठी शिकार केली जात असल्याचे आढळून येते. यामुळे गावशिवारात पक्षी व वन्य प्राणी नामशेष होण्याच्या स्थितीत आले आहेत. वन्य प्राण्यांच्या चोरट्या शिकारीला आळा घालण्यासाठी आता ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला आहे.

political events speed up ahead of assembly elections in maharashtra
बैठकींचे घट.. पक्षांतराच्या माळा! राजकीय घडामोडींना आजपासून वेग
imd predict after above average rainfall severe cold weather in maharashtra
जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका
Rahul Gandh
Rahul Gandhi : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती
girl from goregaon in mumbai committe suicide in a cottage in alibaug
मुंबईतील तरूणीची अलिबागेत आत्महत्‍या
Sharad Pawar in Court Vs Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांची अजित पवारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, घड्याळ चिन्हाबाबत केली ‘ही’ मागणी
Sushil Kumar Shinde Book, Veer Savarkar
Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंच्या पुस्तकात वीर सावरकरांच्या कार्याचा गौरव, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राहुल गांधींनी….”
tuljabhavani festival marathi news
घटस्थापनेने उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव; रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने तुळजाभवानी देवी मंदिराला झळाळी
cyber crime person lost 50 thousand
यूपीआय, ऑनलाइन ॲप, एटीएम कार्ड नसूनही फसवणूक, खात्यातून ५० हजार लंपास
Deepak kesarkar sawantwadi
सावंतवाडीत केसरकर यांच्या विरोधात बॅनरबाजी, ‘आता बदल हवो तर आमदार नवो!’

हे ही वाचा…जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका

गावच्या सरपंचांच्या स्वाक्षरीसह याबाबत ग्रामस्थांना उद्देशून निवेदन जाहीर केले आहे. द्राक्षबागेत कामासाठी वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगारांकडून वन्य प्राण्याची शिकार केली जाऊ नये अशा सक्त सूचना संबंधित कामगार व मुकादमांना देण्यात याव्यात. कामगाराने वन्य प्राण्याची शिकार केल्याचे आढळल्यास संबंधित कामगाराबरोबरच ज्या शेतकऱ्याच्या बागेत संबंधित कामगार काम करत असेल, त्या द्राक्षउत्पादकालाही जबाबदार धरून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. दरम्यान, अशा पद्धतीने ऊस हंगामात साखर कारखान्यांनीही ऊसतोड मजुराबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन मानद वनजीवरक्षक अजित पाटील यांनी केले आहे.