राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या या बंडखोरीवर आणि आरोपांवर प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. ते गुरुवारी (६ जुलै) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“शरद पवारांना वारंवार खोटं बोलावं लागलं”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवार आमच्या सर्वांसाठी आदरणीय आहेत. परंतू ज्या पद्धतीने अजित पवारांनी शरद पवारांचा संपूर्ण आलेख मांडला त्यावरून असं दिसतंय की त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे पक्षही अडचणीत आला आणि त्यांच्याबाबतची विश्वासार्हताही कमी झाली. शरद पवारांना कुटुंबातही वारंवार खोटं बोलावं लागलं. म्हणजे या राजकारणापासून कुटुंबही सुटलं नाही.”

Supriya Sule slams Ajit Pawar group on Pune Accident
Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Eknath shinde mahayuti marathi news
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या मेळाव्याकडे मित्र पक्षांची पाठ
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
leaders pay tributes for Sitaram Yechury
Sitaram Yechurys Death : ‘डाव्या पक्षांचा आवाज हरपला’

हेही वाचा : VIDEO: “अरे पण गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का?”; छगन भुजबळांचा थेट शरद पवारांनाच प्रश्न, म्हणाले…

“अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्यपरिस्थिती सांगितली”

“अजित पवारांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र आणि देशाच्या हिताची आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या सर्वांनी त्यांना बाहेर का यावं लागलं, वेगळं व्हावं लागलं हे मांडलंच आहे. त्यामुळे हे कशामुळे झालं आहे हे पाहिलं पाहिजे. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्यपरिस्थिती सांगितली आहे,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या चुकांमधून धडा घेत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत अजित पवारांची मोठी खेळी, बंडाच्या दोन दिवसआधीच…

“अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे”

“मी स्वतः पवार कुटुंबातील असून कधी खोटं बोलू शकत नाही, असं अजित पवारांनी नमूद करत गंभीर विधानं केली आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. महाराष्ट्र त्यावर विश्वास ठेवेल,” असंही बावनकुळेंनी नमूद केलं.