गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राहुल गांधींनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी “सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, त्यांनी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता”, अशी विधानं केली आहेत. राहुल गांधींनी हिंगोलीत बोलताना केलेल्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असून त्यावरून भाजपानं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी काँग्रेसची साथ देत असलेल्या ठाकरे गटावरही भाजपानं टीकास्र सोडलं आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्यासाठी देशाची माफी मागायला हवी, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा