राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सध्या सुरू आहेत. या निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचं काम राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. त्यामुळे सध्या बैठकांचा धडाका सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच आज मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन काय असेल?, तसेच लोकसभा निवडणुकीतील महायुतीला आलेल्या अपयशावर विचारमंथन करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत नेमकं काय ठरलं? विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात काय चर्चा झाली? यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधत सूचक भाष्य केलं. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्रातील भाजपामध्ये संघटनात्मक बदलाच्या चर्चांवरही आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. छोट्या-छोट्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काम करू’, असंही त्यांनी सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा