गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा रखडला होता. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली जात होती. अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचं नामकरण करण्याच्या प्रस्तावा केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ नामकरण केलं जाणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगर शहराचं नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे.

अहमदनगर हे शहर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान आहे, त्यामुळे अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करावं, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगर होणारच… असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी एक ट्वीट करत दोन्ही शहरांच्या नामकरणाला मंजुरी मिळाल्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारचं अभिनंदनंही केलं आहे.

Will not be forgiven if entrepreneurs are troubled says Devendra Fadnavis
उद्योजकांना त्रास झाल्यास क्षमा केली जाणार नाही… मुख्यमंत्र्यांनी कुठल्या नेत्यांना दिला इशारा!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Devendra Fadnavis
Maharashtra News Updates : आष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार भाषण, सुरेश धस यांना दिली भगीरथाची उपमा
navi mumbai municipal corporation beggars loksatta news
नवी मुंबई : शहरात भिकाऱ्यांचा उपद्रव; पालिका, पोलीस प्रशासन उदासीन
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Anand Anil Khode from Akola will lead commanding procession of All India NCC Parade in Delhi
अकोल्यातील आनंदचे दिल्लीमध्ये संचलनात नेतृत्व, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाचे नेत्रदिपक यश
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल

हेही वाचा- “परकीय आक्रमकांच्या…”, औरंगाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळताच राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

गोपीचंद पडळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशिव’ केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ होणारच…” असा विश्वास गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला.

हेही वाचा- महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…

औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानबादचे नामांतर धाराशिव करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने केलेल्या पाठपुराव्यामुळे नामांतराचा प्रश्न सुटला. आता अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर सुद्धा शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वातच होणार आहे, असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.

Story img Loader