भाजपाला एकनाथ शिंदे सरकारचं ओझं झालं आहे असं वक्तव्य आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. एवढंच नाही तर शिवसेनेने आम्हाला सर्वोच्च पदावर बसवलं आहे. शिवसेना नसती तर आम्ही कुठे असतो? हा प्रश्न मी कायमच विचारतो. उद्धव ठाकरेंनी जे जोडे पुसण्याचं वक्तव्य केलं ते योग्यच आहे. ठाकरे घराणं आणि शिवसेना ही चार अक्षरं होती म्हणूनच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली आहे. जोडे पुसण्याचं वक्तव्य कुणाचंही नाव घेऊन केलं नव्हतं. मग लोक आपल्या अंगाला का लावून घेत आहेत? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“एक नक्कीच आहे की महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला सध्याच्या सरकारचं ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ घेऊन फिरायचं खांद्यावर हा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा मी ऐकतो आहे. अर्थात तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

balasaheb thorat reaction anil bonde remark on rahul gandhi
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Girish Mahajan On Eknath Khadse
Girish Mahajan : “ते पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या नाही”, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Former MP Rajan Vikhare criticizes Chief Minister Eknath Shinde
लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut
Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटची बिले आढळली”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपाने हिंदुत्व..”
What Sanjay Raut Said About Devendra Fadnavis?
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवरायांचं राज्य लयाला नेणाऱ्या पेशवाईचे..”, संजय राऊत यांची टीका

आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. माझ्या पत्रकार परिषदेला कुणीही उत्तर देऊ द्या. माझ्यावर कुणीही टीका करावी. देशात स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे ब्रिटिशांचा कायदा नाही. माझ्यावर माझ्या विरोधकांनी खुशाल टीका करावी माझं काहीही म्हणणं नाही तो त्यांचा अधिकार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मल्लिकार्जुन खरगेचं समर्थन आणि मोदींना टोला

मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना विषारी साप म्हटल्याचं मी ऐकलं. पण ते नेमकं काय म्हटले हे मला माहित नाही. मात्र समजा साप म्हटलं असेल तर गैर काय? कारण महाराष्ट्रात सापाची, नागाची पूजा केली जाते. सापाला देव मानलं जातं. साप हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंचं समर्थन करत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे.