राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असून ते भाजपाच्या वाटेवर आहेत, असंही म्हटलं जात आहे. पण अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सत्तांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. असं असताना आता आशिष शेलारांनी अजित पवारांच्या नाराजीवर आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत अमित शाहांबरोबर महाराष्ट्राच्या सत्तांतरावर काय चर्चा झाली? ते मी उघड करू शकत नाही, असं विधान आशिष शेलार यांनी केलं. शेलारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar : “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग…”, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Dhule Eknath shinde shivsena marathi news
धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका
chhatrapati sambhaji raje slams of dhananjay munde for busy in cultural events
शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेला असताना कृषीमंत्री परळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, छत्रपती संभाजीराजे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका
gulabrao patil controversial statements marathi news
गुलाबरावांची वादग्रस्त विधानांची पाटीलकी
vijay wadettiwar criticized shinde govt
“…पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”; धाय मोकलून रडणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवारांचं टीकास्र!
bjp mla Devyani pharande marathi news
नाशिक: खड्ड्यांसह नागरी समस्यांविषयी भाजप आमदारांचा मनपा आयुक्तांना इशारा
vijay wadettiwar criticized shinde govt
“महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!

हेही वाचा- “एकच वादा…”; अजित पवारांची नाराजी ही राष्ट्रवादीची नियोजित खेळी होती? NCP च्या आमदाराचं मोठं विधान!

अजित पवार भाजपाबरोबर येतील, असं वाटतंय का? असं विचारलं असता आशिष शेलार म्हणाले, “मला वाटतं की, याबाबत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यामुळे असा प्रश्न भाजपाला विचारणं चुकीचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय सुरू आहे? हे त्यांनाच माहीत आहे. अजित पवारांना काय निर्णय घ्यायचाय, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात राज्य करतंय. जनतेची सेवा करतंय. सरकार खंबीर आहे.”

हेही वाचा- “अमित शाह, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी १३ लोकांची हत्या केली”

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलारांनी अलीकडेच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तांतराबद्दल काही चर्चा झाली का? असं विचारलं असता आशिष शेलार म्हणाले, “केंद्रीय स्तरावर जर काही चर्चा असेल, तर ती सार्वजनिक करण्याचा विषयच येत नाही. तो मला अधिकारही नाही. पण राजकारणात काहीही घडू शकतं.” आशिष शेलार यांनी ‘टीव्ही ९ मराठी”शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.