शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात परतणार आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या वाकचौरे यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांना पराभूत केलं होतं.

२०१४ च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, २०१४ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर वाकचौरे भाजपात गेले आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र तिथेही त्यांना अपयश आले. यानंतर आता ते पुन्हा ठाकरे गटात परतणार आहेत. उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहेत.

People unhappy with Ajit Pawar Shivsena demand to leave seat so that one MLA of Mahayuti will not reduced
अजितदादांच्या आमदाराबाबत जनतेत नाराजी, महायुतीचा एक आमदार कमी होऊ नये यासाठी जागा सोडा; शिवसेनेची मागणी
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Eknath shinde appreciated mla Sanjay Gaikwad
मुख्यमंत्र्यांकडून गायकवाड यांचे कौतुक, उपमुख्यमंत्र्यांचे खडेबोल
Atram has challenged ownparty itself sparking controversy in mahayuti
भाजप नेत्याचे स्वपक्षालाच आव्हान! म्हणाले, “उमेदवारी मिळाली नाही तरी…”
AIMIM, Solapur, Congress, AIMIM Solapur,
एमआयएमच्या उमेदवारीने सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ ?
नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण, मतदान यंत्र परत मिळविण्यासाठी निवडणूक आयोग उच्च न्यायालयात
Assembly Election 2024 NCP Congress Ajit Pawar Group BJP Uddhav Thackeray Group
अजित पवार गटामुळे भाजपला गळती?
Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore MArathi News
कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान

हेही वाचा- “आम्ही आमचाच टेंभा मिरवतोय, असं…”, शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, “आज मी स्वगृही परतत आहे. २००९ च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मला खासदार केलं होतं. २०१४ ला जे घडलं किंवा घडवलं गेलं, त्याची मी पुन्हा चर्चा करू इच्छित नाही. परंतु एकच सांगू इच्छितो की, ‘सुबह का भुला शाम को घर आ जायें, तो उसे भुला नहीं कहते’, या उक्तीप्रमाणे मी स्वगृही परतत आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मी शिवबंधन बांधून घेत आहे.”