“महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे. एवढचं नाही तर महाविकास आघाडीतील आणि अपक्ष आमदारही वैतागले” असल्याचा आरोप भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. संजय राऊत यांना सत्तेचा माज आला असून त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केल्याची टीका बोंडे यांनी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बोंडे नागपूरात दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

संजय राऊतांवर टिकास्त्र

devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा

संजय राऊत यांच्याकडेही यंत्रणा आहे. संजय राऊत बदलेच्या भावनेने प्रत्येक वेळेस चूका करतात. राऊत द्वेषाने पेटलेले आहेत. सत्ता लोकांसाठी असते. लोकांच्या भल्यासाठी असते. मात्र, संजय राऊत यांना सत्तेचा माज आला असल्याची टीका बोंडे यांनी केली आहे. संजय राऊत आणि शिवसेनेने अपक्ष आमदारांचाही अपमान केला आहे. म्हणजे अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा संजय राऊत यांनी केला असल्याचेही बोंडे म्हणाले.

महाविकास आघाडीवर निशाणा

महाविकास आघाडीतल्या आमदारांकडून त्यांचे मंत्री कमिशन घेतात तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? असा सवालही बोंडे यांनी केला. आघाडीतील आमदारांनाच त्यांचे मंत्री, मुख्यमंत्री भेटत नाहीत तर जनतेला केव्हा भेटणार. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. आणि यांच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत असल्याचा आरोपही बोंडे यांनी केला आहे. सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळाचीच आठवण येत आहे. त्यामुळे जनतेची देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत अशी इच्छा असल्याचा दावा बोंडे यांनी केला आहे.

Story img Loader