Ashish Deshmukh On Dhananjay Munde Dilip Walse Patil : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत सामना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांत जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. मात्र, असं असतानाच महायुतीत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. अशातच भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “अनिल देशमुख यांच्या दबावामुळे मंत्री धनंजय मुंडे आणि सुनील केदारांच्या दबावावर दिलीप वळसे पाटील विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दुर्लक्ष करत असून राजकारण करत आहेत”, असा आरोप आशिष देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा