राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर ही धाड टाकण्यात आली आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं समोर येत आहे. यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘एबीपी माझा’शी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, “शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे लाडके हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावायला १५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबलं होतं. पण, मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन दिलं आहे, की सर्व घोटाळेबाजांचा हिशोब घेऊनच राहणार आहे.”

kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
girish mahajan chhagan bhujbal l
छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? गिरीश महाजन म्हणाले…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”

हेही वाचा : सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

“ग्रामविकास मंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी १५०० कोटी रुपयांचं कंत्राट जावयाच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला दिलं. सरसेनापती कारखानाच्या माध्यमातून १५८ कोटी रुपयांचं मनी लाँड्रींग करण्यात आलं. या सर्वांचा आता हिशोब होत आहे,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विशिष्ट जातीच्या…”

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होतं. २०२० साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

Story img Loader