ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. हसन मियाँना हिशोब द्यावाच लागेल असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो तेव्हा मला अडवलं होतं तेव्हा धर्म आठवला नाही का? गोरगरीबांचा पैसा खात होतात तेव्हा धर्म आठवला नाही का? ईडीने कारवाई सुरू केल्यावरच धर्म कसा आठवला असा प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

हे पण वाचाHasan Mushrif ED Raid: NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी; कागलमध्ये समर्थक आक्रमक

Baba Siddique murder case, conspirator, person arrested from Haryana,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : कट रचणारा व शूटर्समधील दुवा पोलिसांच्या हाती, हरियाणातून एकाला अटक
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
clash by Vanchit Bahujan Aghadi workers in Yogendra Yadavs meeting
योगेंद्र यादव यांच्या सभेत वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; धक्काबुक्की, घोषणाबाजी अन् खुर्च्यांची तोडफोड
Bhartiya Janata Yuva Morcha commotion and announcement at Shyam Manavs event
नागपूर : श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजयुमो कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि गोंधळ, काय घडले?
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Supriya Sule slams Ajit Pawar group on Pune Accident
Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
Ruta Awhad Sparks Controversy osama bin laden apj abdul kalam
Video: “ओसामा बिन लादेन दहशतवादी म्हणून जन्मला नाही, त्याला समाजानं…”, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीकडून अब्दुल कलाम आणि लादेन यांची तुलना

नेमकं काय म्हणाले आहेत किरीट सोमय्या?

मला कोल्हापूरला जाऊ दिलं नव्हतं. पण आज मला महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला. हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या कंपनीकडून मुश्रीफ यांच्या कुटुंबाच्या खात्यात १३ कोटी रूपये आले. जी कंपनी अस्तित्त्वात नाही त्यातून मुश्रीफ कुटुंबाला रक्कम येते आणि साखर कारखान्यात कशी जाते? असा प्रश्नही किरीट सोमय्यांनी विचारला आहे. मी मुस्लिम असल्याने हे छापे मारले जात आहेत, जाणीवपूर्वक छापे मारले जात आहेत असं हसन मुश्रीफ म्हणाले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी जेव्हा लोकांचा पैसा खाल्ला तेव्हा तुम्हाला धर्म आठवला नाही का? ईडीने कारवाई केल्यावरच धर्म कसा आठवला असा प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

हे पण वाचा- हसन मुश्रीफांच्या घरी ईडीकडून छापेमारी; राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले…

हसन मुश्रीफ यांनी काय म्हटलं आहे?

NCP चे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी छापे टाकले आहेत. कागल आणि पुण्यातल्या घरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांनी या सगळ्या कारवाईनंतर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू नये असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- किरीट सोमय्या यांची भविष्यवाणी अन् ‘ईडी’ची कारवाई

हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके काय आरोप आहेत?

कोल्हापूरच्या अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचं हे प्रकरण आहे. या कारखान्यातला ९८ टक्के पैसा आर्थिक गैरव्यवहारातून उभा करण्याचा मुख्य आरोप मुश्रीफ यांच्यावर आहे.या घोटाळ्यात हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांचा प्रमुख सहभाग आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी अवसायनात काढण्यात आला होता. हा कारखाना बिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला. बिस्क इंडिया ही कंपनी हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांची आहे. या व्यवहारासाठी कोलकाता येथील शेल कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आल्याचाही आरोप आहे. या बोगस खात्यांमध्ये जमा केलेले पैसे मतीन मंगोलींच्या बिस्क इंडिया कंपनीत वळते केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.