माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत आपण नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब चुकता करणार आहोत हे सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच दुसऱ्य दिवशी ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत.

किरिट सोमय्यांनी व्हिडिओत काय म्हटलं होतं?
नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्यांनी जाहीर केलं होतं. एक व्हिडिओ ट्विट करत किरीट सोमय्या म्हणाले की उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात अनिल परब, हसन मुश्रीफ, अस्लम खान, किशोरी पेडणेकर यांच्या सदनिका आणि ठाकरे परिवाराचे १९ बंगले हे सगळे घोटाळे बाहेर काढणार. त्यानंतर ते आज तातडीने रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत.

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”

ठाकरे परिवाराच्या १९ बंगल्यांचा हिशोब सुरू असंही ट्विट

किरीट सोमय्यांनी नवीन वर्षी सकाळी ११.३० ला रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असाही इशारा दिला होता. त्या आशयाचं एक ट्विटही किरीट सोमय्यांनी केलं होतं. त्यानंतर ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले.

फेब्रुवारी महिन्यातही किरीट सोमय्यांनी दाखल केली होती तक्रार

“रश्मी उद्धव ठाकरे यांच्या कोर्लई गावातील १९ बंगल्यांची कागदपत्रं देत आहोत. आम्हाला आतापर्यंत हे बंगले तिथे आहेत, असं सांगण्यात येत होतं. लेखी उत्तरं सुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर बंगले नाहीत.’
असं सांगण्यात येतं आहे. सदर जागेवरील बंगलोचं काय झालं याची चौकशी करावी, विनंती”, अशा आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांना दिली आहे. यावर आमदार प्रशांत ठाकूर, महेश भोसले यांनीही सह्या केल्या होत्या.

फेब्रुवारी २०२२ मध्येही किरीट सोमय्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं होतं त्यावेळी त्यांनी कोर्लई या गावाला भेटही दिली होती. कोर्लई या गावातल्या सरपंचांनी २०१९च्या ग्रामसभेत रश्मी ठाकरे यांनी अर्ज केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की २०१४ मधअये मी जो करार नोंदणी केला ती जमीन आणि इतर सर्व गोष्टी अन्वय नाईक यांच्याकडून घेतल्या. ताडाची, माडाची झाडं, विहिरी हे सगळं माझं आहे. जमीन माझ्या नावावर झाली आहे. मात्र घरंही माझ्या नावार झाली पाहिजेत असं रश्मी ठाकरेंनी अर्जात म्हटल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. मे २०१९ च्या ग्रामसभेत सरपंचांनी प्रस्ताव मंजूर केला. त्यात सगळी घरं रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या नावे करावीत असं म्हटलं होतं. जून २०१९ मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला. ही घरं त्यांच्या नावावर करण्यात आली असंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं होतं. आता पुन्हा याच बंगल्यांवरून सोमय्या आक्रमक झाले आहेत हे पाहण्यास मिळतं आहे.

Story img Loader