शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र सत्ता स्थापन केली. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावरती आता माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाष्य केलं आहे.

लातूरमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या मेळाव्याला संभाजी पाटील निलंगेकर संबोधित करत होते. “भाजपात अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण, लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते. आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची काम लपवण्यासाठी भाजपात यायचं म्हणत आहेत. मात्र, हे काय येत नाहीत आणि आम्ही काय घेत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला प्रिन्स नको, तर सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपात हवा,” असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं.

Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
What are measures taken by Mumbai Municipal Corporation to prevent pollution Why is pollution not reducing
प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे उपाय कोणते? तरीदेखील प्रदूषण कमी का होत नाही?
illegal residents in Sanjay Gandhi National Park
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहतात ४० हजार बेकायदा नागरिक? न्यायालयाच्या नाराजीनंतर अतिक्रमणे कमी होतील का?
Parents shown good response for admission to Mumbai Municipal Corporations CBSE ICSE IB and IGCSE schools this year
महापालिकेच्या केंद्रीय मंडळाच्या शाळांना पालकांकडून चांगला प्रतिसाद, १२४२ जागांसाठी २७०० अर्ज – ३ फेब्रुवारीपासून काढणार सोडत
Auction , properties , Pimpri, properties in Pimpri,
पिंपरीतील ४३ मालमत्तांचा लिलाव, मालमत्तांचे मूल्य २२१ कोटी रुपये; काय आहे कारण?
robber demanded rs 1 crore before attacking saif ali khan ten teams for investigation
शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर; तपासासाठी दहा पथके ; एक कोटीची मागणी करत सैफवर हल्ला

हेही वाचा : “…तर आमच्यात चर्चा होऊ शकते,” एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान!

लातूर महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना पाटील म्हणाले, “जे कार्यकर्ते ३५ वर्षाच्या आतील आहेत, त्यांनी निवडणुकीची तयारी करावी. महापालिकेच्या ८० टक्के जागांवर ३५ वर्षाच्या आतील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे,” असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : ‘धर्मवीर’ वादावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली! अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले “दाढी काढल्यावर त्याला…”

प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं भाकीत

‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आल्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याबद्दल विधान केलं होतं. “काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडवणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

Story img Loader