लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळ यांनी महायुतीत अजित पवार गटाला विधानसभेला किती जागांचा शब्द देण्यात आला होता? यावर भाष्य केलं. विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिलेला असल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी छगन भुजबळांच्या विधानाला उत्तर देत अशा प्रकारचं धुकं निर्माण करू नका, असं म्हटलं आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“जागावाटप असेल किंवा विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील मागणी असेल ही मागणी चॅनेलच्या माध्यमातून कधीही होत नाही. मात्र, यातून काही कारण नसताना अडचणी आणि समस्या निर्माण होतात. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काही मत असेल किंवा इतरांचं मत असेल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्यात, असं म्हणणं गैर आहे. यामध्ये तुम्हाला कोणी आश्वस्थ केलं, याचा कोणताही पुरावा नसतो, तरीही सांगायचं असेल तर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आम्हाला एवढ्या जागा देण्यासंदर्भात या नेत्यांने शब्द दिला होता. पण अशा प्रकारचं धुकं निर्माण करण्यात काहीही कारण नाही”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

mla sudhir gadgil marathi news
सांगली: सुधीर गाडगीळ यांची निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांकडून फेरविचाराची मागणी
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Sharad Pawar and Devendra Fadnavis
Harshvardhan Patil : देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांचा धक्का? निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ भाजपा नेता तुतारी हाती घेण्याच्या चर्चांना उधाण
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
MPSC Exam Loss of two lakh candidates for five thousand students
MPSC Exam : एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध का होत आहे?
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
Sanjay Raut On Sharad Pawar VS Ajit Pawar
Sanjay Raut : “शरद पवार हे अजित पवारांना सोडून बाकीच्या सर्वांना पुन्हा…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

हेही वाचा : “मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो?” ठाकरे गटाचा मोदींना टोला

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

“एक निवडणूक झाली. आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील असं सांगितलं होतं. यावेळेला (लोकसभेला) जी खटपट झाली ती खटपट पाहाता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे. हे त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०, ६० निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या. मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार?”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली होती?

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिला होता. तेवढ्या जागा मिळायला हव्यात, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील. योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिनही पक्षाला जागा मिळतील. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपाला सर्वाज जास्त जागा मिळतील. मात्र, आमच्याबरोबरच्या दोनही पक्षाचा सन्मान केला जाईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.