शिर्डी : भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे ऊठसूठ वक्तव्ये किंवा बोलघेवडेपणा करू नये, अशा कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी विस्तारित प्रदेश सुकाणू समितीच्या बैठकीत दिल्या. त्याचबरोबर सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनीही पार पाडली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा >>> सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन

Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
opposition creates uproar in parliament over us alleged mistreatment of indian deportees
बेड्यां’वरून रणकंदन; आक्रमक विरोधकांमुळे संसदेत सरकारची कोंडी, अमेरिकेच्या प्रक्रियेचा भाग’; जयशंकर यांचे उत्तर
america president donald Trump Benjamin Netanyahu statement Gaza palestine unrest in Middle East
गाझावर आमचे राज्य… पॅलेस्टिनींनी जावे इतरत्र…! ट्रम्प यांच्या दाव्याने पुन्हा पश्चिम आशियात अस्थैर्य?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Israeli Palestinian Conflict
अन्वयार्थ : अरबांची जरब…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका

भाजपचे प्रदेश अधिवेशनाचा समारोप झाल्यावर शहा यांनी विस्तारित सुकाणू समिती व निवडक ३० नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे आदी नेते त्यास उपस्थित होते.पक्षातील काही नेते, आमदार, मंत्री कोणत्याही विषयांवर प्रसिद्धीमाध्यमांपुढे भाष्य करतात. त्यामुळे सरकार व पक्षाची अनेकदा पंचाईत होते. त्यामुळे पक्षाकडून सूचना आल्यावरच नेत्यांनी संबंधित विषयावर बोलावे, अन्यथा बोलू नये, अशी सूचना शहा यांनी केली. त्याचबरोबर जातीयवादी मुद्दे किंवा विषयांपासून नेत्यांनी दूर राहावे. समाजातील जातीय सलोखा कायम रहावा, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारची प्रतिमा सांभाळण्याची जबाबदारी केवळ सरकारवर आहे, असा समज ठेवू नये. ही जबाबदारी संघटना व नेत्यांचीही आहे. त्यामुळे सरकारचे निर्णय, योजना आदी माध्यमातून सरकारची प्रतिमा जनतेपुढे चांगल्याप्रकारे कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत आणि पक्षाने सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशा सूचना शहा यांनी दिल्या. पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत, असेही त्यांनी नमूद केले.

Story img Loader