शिवसेना खासदार संजय राऊत जामिनानंतर तुरुंगाबाहेर आल्यावर अधिक आक्रमक दिसतील असा अंदाज बांधला जात असतानाच प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसलं. राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आणि कटुता संपवण्याची भाषा केली. तसेच फडणवीसांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांना विचारणा केली असता त्यांनी संजय राऊतांना जोरदार टोले लगावले. ते गुरुवारी (१० नोव्हेंबर) एपीबी माझाशी बोलत होते.

अतुल भातखळकर म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. संजय राऊत कटुता संपवण्याची भूमिका मांडणार असतील, तर चांगली गोष्ट आहे. फक्त त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून,स्वतःच्या पक्षापासून करायला हवी. खोके, गद्दार, खंजीर, लोकांना घरात जाऊन मारहाण केल्यानंतर शिवसैनिकांचं समर्थन करणं, माजी नौदल अधिकाऱ्यांना केलेली मारहाण हेही थांबवावं.”

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
ajit pawar
उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!
Dhananjay Munde
“महायुतीतील नेत्यांकडूनच माझ्याविरोधात…”, अजित पवारांसमोर धनंजय मुंडेंनी मांडली व्यथा; बीडमधील हत्या प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले…
Shiv Sena is unhappy after Yogesh Kadam from Ratnagiri district was left out of the list for the post of Guardian Minister
योगेश कदम यांना डावलले

“कटुता वाढण्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि…”

“मागील दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील कटुता वाढली. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना, त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, जितेंद्र आव्हाड अशी मंडळी आहे,” असा आरोप भातखळकरांनी केला.

कटुता संपवावी ही भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. कारण…

अतुल भातखळकर पुढे म्हणाले, “कटुता संपवावी ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. कारण आमची ती कायमची भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयी कायम म्हणत आलेत आणि आम्हीही म्हणत आलो की, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, तर विरोधक असतो. हल्ले करायचे, घाणेरड्या भाषेत बोलायचं असं सुरू आहे.”

हेही वाचा : संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…”

“…तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता संपण्याची शक्यता”

“संजय राऊतांनी काय भाषा वापरली हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी जी भाषा वापरली ती ना माध्यमं दाखवू शकले, ना मी आत्ता ते बोलू शकतो. ही पश्चात बुद्धी आहे, मात्र तरीही त्याचं स्वागत आहे. त्यांना कटुता संपवण्याच्या दिशेने पावलं टाकायची असतील तर आजपासून त्यांच्या व्यवहारात त्याचं दर्शन घडावं. तसं झालं तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता संपण्याची शक्यता आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader