सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला १५ दिवसांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करायचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षण गेल्याची तीव्र भावना व्यक्त होत असताना त्यावरून विरोधी पक्षांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केल्याची टीका भाजपाने केली आहे. यासंदर्भात जालन्यातील मंठा शहरात नागरिकांशी बोलताना भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. त्यांनी आक्षेपार्ह भाषेत राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या विधानावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

“सरकारचे बदमाश, लफंगे मंत्री”

“इम्पिरिकल डाटा तयार करून, ट्रिपल टेस्ट करून ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली असती तर हजार टक्के ओबीसी आरक्षण वाचलं असतं. पण हे सरकार आणि या सरकारमधले बोलघेवडे, खोटारडे, बदमाश, लफंगे मंत्री यांना समुद्रात बुडवलं पाहिजे. ही खोटारडी औलाद सातत्याने सांगत होती की मोदींनी, केंद्र सरकारने आम्हाला डेटा दिला पाहिजे”, असं बबनराव लोणीकर म्हणाले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar 10 to 12 retake for this scene
‘बांगड्या गरम, बांगड्या गरम’चा सीन करण्यासाठी झेंडूने घेतले होते ‘इतके’ रिटेक, सायली भांडाकवठेकर म्हणाली…
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”
lodha family dispute
लोढा कुटुंबात वादाचे तडे, व्यापारचिन्हाच्या मालकीवरून भावांमध्ये न्यायालयीन संघर्ष
saif ali khan attack marathi news
सैफ हल्ला प्रकरण : सीमेवरील नदी ओलांडून भारतात प्रवेश, आरोपीकडे कोलकातातील व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड
Greeshma Poisoning Case Verdict
Greeshma Poisoning Case Verdict: विष देऊन बॉयफ्रेंडला मारलं; न्यायालयानं गर्लफ्रेंडला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा, मन सुन्न करणारी क्राइम स्टोरी

“मनमोहन सिंग सरकारच्या काळात डेटा गोळा केला”

“मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. दिल्लीत, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. सगळा देश काँग्रेसच्या ताब्यात होता. तेव्हा हा सर्वे झाला होता. त्यात ६९ हजार चुका होत्या. तो डाटा कधीच मनमोहन सिंग सरकारने कुठल्या राज्याला दिला नाही. काँग्रेसने ५० वर्षांच्या हयातीत तो डाटा बाहेर काढला नाही. पण राज्यातले ओबीसी मंत्री देखावा निर्माण करत आहेत. रुमाल गळ्यात घालून भाषणं करत आहेत. माध्यमांमध्ये बोलत आहेत”, असं देखील लोणीकर यावेळी म्हणाले.

“तुम्ही गावागावात जाऊन सांगा की..”

यावेळी बोलताना लोणीकर यांनी उपस्थित नागरिकांना सरकारबद्दल गावागावात सांगण्याचं आवाहन केलं आहे. “तुम्ही गावागावात जाऊन सांगा की ही बेईमान औलाद आहे. हिरव्या हराळीमध्ये साप दिसत नाही. हा महाराष्ट्रातला तीन पक्षांचा विषारी साप किती विषारी आहे हे गावागावात समजावून सांगावं लागेल”, अशा शब्दांत लोणीकरांनी टीका केली आहे.

Story img Loader