सांगली : दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने जतसाठी पाणी मिळावे, म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी संपूर्ण निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी भाजपा व मित्रपक्षांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे विजापूर-गुहागर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

जतमध्ये यंदा पाउस लांबल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आताच भासत असून जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करावे, पूर्व भागातील ४१ गावांसाठी विस्तारित योजना मंजूर करण्यात आली असली तरी या कामाची अपुरी निविदा काढण्यात आली आहे, ती पूर्ण योजनेसाठी काढण्यात यावी, जतचा समावेश अमृत योजनेत करावा आदी मागण्यांसाठी गुहागर विजापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पुण्याच्या पाण्याचे पालकत्व कुणाकडे?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
On which day will water supply be stopped in Nagpur
नागपुरात कोणत्या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार? ३० तास …
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी

हेही वाचा – सांगली : बस शेडमध्ये घुसल्याने चालक आणि वाहकासह १६ जखमी

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस, सुमित मलिक आणि सुवेझ हक यांची उलटतपासणी घ्या; प्रकाश आंबेडकर यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी

या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले. या आंदोलनामध्ये जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, आकाराम मासाळ, रामन्ना जीवनणावर, बसगोंड, जबगोंड, लक्ष्मण बोराडे, अविनाश वाघमारे, मकसूद नगारजी, संतोष कोळी आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपा, रिपाइं या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन सुरू करण्यात आले. महाराणा प्रताप चौकामध्ये महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या मारला होता. यामुळे विजापूर, सांगोला, सातारा, अथणी मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

Story img Loader