शिवसेना ( शिंदे गट ) खासदार गजानन कीर्तिकर यांची भाजपाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्तरावर सत्तेची सर्व सूत्र भाजपाकडे आहेत. पण, महाराष्ट्राचा विचार केला, तर भाजपाला एकहाती सत्तेची सूत्र कधीच मिळाली नाहीत. मिळण्याची शक्यताही नाही, असं विधान गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गजानन कीर्तिकर म्हणाले, “राष्ट्रीय स्तरावर भाजपाचे ३५० खासदार निवडून येतात. तर, महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेना नाही आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला २२ आणि भाजपाला २६ जागा असं वाटप झालं होतं. तेव्हा आमचे १८ खासदार निवडून आले, तर चार जणांचा पराभव झाला. भाजपाचे २३ जण निवडून आले, ३ जणांचा पराभव झाला. ही महाराष्ट्राची राजकीय स्थिती आहे.”

Lakhan Malik
Lakhan Malik : भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे आमदार लखन मलिक ढसाढसा रडले; म्हणाले, “इमानदारीने काम केलं, पण…”
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
chiplun Sangameshwar assembly constituency We will get to see fight like NCP vs NCP
चिपळूण-संगमेश्वर मधील राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी लढतीत मुस्लीम मते निर्णायक ठरणार
Sanjay Raut
Sanjay Raut : “महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत, भाजपाला हरवायचं असेल तर…”; संजय राऊत यांचं वक्तव्य
Jayant Patil
Jayant Patil : निवडणूक जाहीर होताच जयंत पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “आता एका टप्प्यात…”
supriya sule on harshavardhan patil joins ncp sharad pawar
पूर्वीचे वाद विसरून हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत काम कसं होणार? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या, “इतक्या वर्षांत…”
Narendra Modi Speech in Thane
Narendra Modi Marathi Speech : “महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय…”, ठाण्यात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी मराठीतून संवाद; म्हणाले…
PM Narendra Modi
PM Narendra Modi : “विकासकामे थांबवणाऱ्यांना सत्तेपासून लांब ठेवा”, पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

हेही वाचा : अजित पवार खरंच नाराज आहेत? संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल रात्री ते…!”

“राष्ट्रीय स्तरावर भाजपाचे ३५० खासदार निवडून येत असले, तरी महाराष्ट्रातील स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात भाजपा कमकुवत आहे, असं मत नाही. पण, शिवसेनेपेक्षा भाजपा मजबूत आहे, असंही मान्य करणार नाही,” असं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : “भर उन्हाळ्यात दुपारी कार्यक्रम घेण्याची काय गरज होती?”; ११ जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांचा शिंदे सरकारला सवाल; म्हणाले, “शक्तीप्रदर्शनाची हौस…”

भविष्यात भाजपा आणि शिवसेनेचं जागावाटप कोणत्या पद्धतीने असेल? असा प्रश्न विचारल्यावर गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२६ जागांवर शिवसेना आणि १६२ जागांवर भाजपाचे उमेदवार लढले होते. भाजपाचे १०२ उमेदवार जिंकले. तर, शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत याच पद्धतीने जागावाटप झालं पाहिजे.”