नवाब मलिकांविषयी जी भूमिका देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी घेतली आहे ती भूमिका प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत न घेतल्याने फडणवीस आणि भाजपाचं ढोंग उघड झालं आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो आहोत की नवाब मलिकांविषयीची भूमिका प्रफुल्ल पटेलांबाबत का नाही? यावर सगळ्यांची तोंडं शिवली गेली आहेत, वाचा बसली आहे. आम्हाला जे म्हणत आहेत की तुम्ही जाळ्यात फसलात ते स्वतःच जाळ्यात फसले आहेत आणि त्यांचा कपाळमोक्ष झाला आहे अशी टीका संजय राऊत यांनी केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आपली भूमिका काय? हा साधा प्रश्न आम्ही विचारला. त्याचं उत्तरच भाजपा आणि देवेंद्र फडणवीस द्यायला तयार नाहीत. उत्तर द्या, सांगून टाका प्रफुल्ल पटेल महात्मा, धर्मात्मा आणि महान व्यक्ती आहेत. इक्बाल मिर्ची हा संत आहे. दाऊद इब्राहिम विश्वपुरुष हे भाजपाने, फडणवीसांनी सांगितलं पाहिजे. त्यामुळे अशा लोकांशी व्यवहार करणं हे काय चुकीचं नाही हे स्पष्ट करा.

loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
ajit pawar
उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!

भाजपा प्रफुल्ल पटेलांबाबत गप्प का?

“काँग्रेसचे खासदार धीरज साहूंकडे २०० कोटी सापडले म्हणून भाजपाचे लोक ढोल वाजवत आहेत. मात्र ४०० कोटींचा व्यवहार दाऊदच्या हस्तकासह झाला आहे त्याविषयी भाजपा गप्प आहे. दाऊद त्यांचा आहे की प्रफुल्ल पटेल त्यांचे आहेत? दाऊदवर प्रेम आहे की प्रफुल्ल पटेल यांना संरक्षण दिलं जातं आहे याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून करायला हवं होतं. २०२२ ला आमचं सरकार ताब्यात घेतल्यावर त्यांचं म्हणणं होतं की दाऊद इब्राहीम आणि त्याच्या हस्तकांच्या कारवाया नजरेस आल्या तर कठोर कारवाई करेन.”

“आता दाऊद आणि त्याच्या हस्तकाच्या कारवाया उघड झाल्या आहेत. नवाब मलिक यांच्यापुरत्या त्या मर्यादित नाहीत. त्या तुमच्यापर्यंत पोहचल्या आहेत. हे हस्तक मोदी आणि अमित शाह यांना खुलेपणाने भेटत आहेत. मग तुम्ही मोदींवर, अमित शाह यांच्यावर कारवाई करणार ते सांगा. एखादा हस्तक जेव्हा दाऊदशी संबंध ठेवतो तेव्हा त्याचं नेक्सस तोडलं जातं. आता कुणावर कारवाई करणार? जाळं भाजपानेच फेकलं आहे आणि त्यात भाजपाचेच लोक अडकले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.” संजय राऊत यांनी जी टीका केली आहे त्याला भाजपाकडून काही उत्तर मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader