लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशासह राज्यात मोठ्या घडामोडी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित असं यश मिळालं नाही. महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेत मोठं विधान केलं. “महायुतीला महाराष्ट्रात काही जागा कमी आल्या, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो. मी स्वत:यामध्ये कमी पडलो. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहून संघटनेचं काम करावं”, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा