लोकसत्ता वार्ताहर

अहमदनगर : नदीपात्रामध्ये असलेल्या समर्थ बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली आहे. यावेळी शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्यामुळे इतर १५ ते २० म्हशींचे प्राण वाचले असून स्वतः शेतकऱ्याचादेखील जीव वाचला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : महायुती सरकार आल्याने काय बदल घडला? शरद पवारांचा ‘तो’ फोटो शेअर करत भाजपाचा चिमटा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Pooja Khedkar in delhi high court
Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती!
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

याबाबत घडलेली घटना अशी की शेतकरी सोपान बरबडे हे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी चारण्यासाठी या परिसरामध्ये घेवून आले होते. यानंतर म्हशी तहान लागल्याने कर्जत शहरातील लेंडी नदीवर समर्थ बंधारा आहे त्या बंधार्‍यामध्ये पाणी पिण्यासाठी आल्या. नेहमीप्रमाणे या सर्व म्हशी पाण्यामध्ये जात असताना सर्वप्रथम चार मशीन पाण्यामध्ये गेल्या. त्यामध्ये विजेचा प्रवाह आलेला होता आणि अवघ्या काही सेकंदात या चारही म्हशी विजेचा धक्का बसल्यामुळे तडफडून पाण्यात कोसळल्या. पाणी पाजण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या हे लक्षात आले. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत पाठीमागून पाण्याजवळ धावत येत इतर सर्व म्हशींना पाण्यामध्ये प्रवेश करू न देता पाठीमागे ढकलले. यामुळे इतर पंधरा ते वीस म्हशींचे प्राण वाचले. यावेळी पाण्यापासून स्वतःला लांब ठेवल्यामुळे या शेतकऱ्याचा देखील जीव वाचला.

आणखी वाचा- Sharad Pawar : महायुती सरकार आल्याने काय बदल घडला? शरद पवारांचा ‘तो’ फोटो शेअर करत भाजपाचा चिमटा

त्या शेतकऱ्याने तात्काळ महावितरण कंपनीच्या कर्जत कार्यालयाला फोन करून माहिती कळवली. यानंतर त्यांनी तात्काळ या परिसरातील विजेचा प्रवाह बंद केला. दरम्यान यानंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी घेऊन त्यांनी पंचनामा केला आहे . या परिसरातून जाणारी वीज वाहक तार तुटून ती पाण्यामध्ये पडली होती व त्याचा प्रवाह पाण्यामध्ये उतरला असल्याचे दिसून आले.

तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील शविच्छेदन केले आहे. शेतकरी सोपान बरबडे यांनी कर्ज काढून या सर्व म्हशी खरेदी केल्या असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.