सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजापुरातील नाणार रिफायनरी संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जमीन अधिग्रहणासोबतच शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रलंबित मोबदला देण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. नाणार प्रकल्प नक्की होणारच, असे यावेळी चव्हाण म्हणाले. दरम्यान, शिवसेना नेते राजन साळवींसोबत झालेल्या बैठकीवर चव्हाण यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना कोकणातील समस्यांसदर्भात चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Video : “शिल्लक सेनेसोबत संभाजी ब्रिगेडने..”, शिंदे गटाकडून राष्ट्रवादीचा उल्लेख करत शिवसेनेवर आगपाखड!

France ai summit loksatta news
फ्रान्समध्ये आजपासून ‘एआय’ शिखर परिषद
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Publication of the book amhi sanghat ka ahot written by Ramesh Patange
‘आम्ही संघात का आहोत’
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
Superstition Eradication Committee to launch courses for public education against superstition
अंधश्रद्धाविरोधी लोकशिक्षणासाठी अंनिस अभ्यासक्रम सुरू करणार
maharashtra cabinet approves rs 315 5 crore for repair leaks in temghar dam
टेमघर धरणाची गळती थांबणार;  जाणून घ्या, गळती रोखण्यासाठी किती कोटींची तरतूद
Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता

भाजपा आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी चव्हाण यांनी घेतलेल्या राजकीय भेटीगाठींमुळे वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहील असं काही दिवसांपूर्वी साळवी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा साळवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

यंदाचा शिवसेना दसरा मेळावा कोणाचा? उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा? परवानगीबद्दल फडणवीस स्पष्टच म्हणाले, “गृहमंत्री म्हणून…”

दरम्यान, रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाबाबत काही ग्रामस्थांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी निलेश राणेंचा ताफा अडवला होता. राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.

Story img Loader