सिनेटची निवडणूक स्थगित झाली कारण मिंधे आणि भाजपा गटाची तयारी नाही. कार्यक्रमत तयार होता तरीही निवडणूक स्थगित झाली. अशा गोष्टी घडणं लोकशाहीसाठी घातक आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

निवडणुका स्थगित होणं हे घातक आहे. देशात आपल्या लोकशाही नाहीये असंच समजून आता आपल्याला काम करावं लागणार आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामागे नेमकं कोण आहे हे तपासून बघावं लागेल असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
nitin gadkari
Nitin Gadkari : “राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?
bjp mp anil bonde made controversial statement on rahul gandhi over his reservation remark
राहुल गांधींच्‍या जिभेला चटकेच दिले पाहिजे….. आमदार  गायकवाडांनंतर आता  भाजपच्या ‘या’ नेत्याने थेट…..
Vice President said Today we are in corruption free India
नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : ‘सल्ला’ आणि ‘निर्देश’
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

बालेकिल्ला वगैरे काही नसतो..

तुम्ही छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात चाललात का? असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले बालेकिल्ला कुणाचाही नसतो. मी तिथल्या तरुणांशी संवाद साधण्यासाठी चाललो आहे. नितीन गडकरीच नाही अनेक लोक आता हेच सांगत आहेत. आत्ता जे घटनाबाह्य सरकार बसलं आहे त्यात दोन पक्ष फोडण्यात आले. एक परिवार फोडला. पण जे कॅबिनेट त्यांनी बसवलं आहे त्यात भाजपाला काय मिळालं? ज्यांनी २५ ते ३० वर्षे पक्षासाठी दिली आहेत अशांना काहीही मिळालेलं नाही. पाच ते सहा जण मंत्री आहेत बाकी सगळे इंपोर्टेड आहेत आणि दुसऱ्या पक्षातले रिजेक्टेड आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपा महाराष्ट्राला मागे नेत आहे अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.

सिनेटची निवडणूक शुक्रवारी स्थगित

मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयानंतर तयारी करत असलेल्या युवासेना आणि मनसे विद्यार्थी सेनेला मोठा धक्का बसला आहे. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. सिनेट निवडणुकीला सामोरं जायला मुख्यमंत्री घाबरतात, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. आता मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्र लिहित भाजपावर टीका केली.

राज्यपाल रमेश बैस यांना लिहलेल्या पत्र अमित ठाकरे म्हणाले, “मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश’ येईपर्यंत विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे.