सरकारमध्ये तिसरा भिडू आला आहे. त्यामुळे काही मंत्र्यांचा शपथविधी राहिला असून, खातेवाटपात गडबड होणार आहे, असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केलं आहे. काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे, असं चंद्रकातं खैरे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“सरकारमध्ये तिसरा भिडू आला आहे. तसेच, काही मंत्र्यांचा शपथविधी राहिला असून, खातेवाटपात गडबड होणार आहे. त्यामुळे खातेवाटपास थोडा विलंब होत आहे. मात्र, याचा अर्थ खातेवाटपावरून कोणी नाराज नाही आहे. अर्थमंत्रीपदाबाबत वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल,” असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं होतं.

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

हेही वाचा : “…अन् त्याचा राग बच्चू कडूंना आला आहे”, ठाकरे गटातील नेत्याचं विधान…

यावर बोलताना चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, “अजित पवारांमुळे बाकीच्यांना मंत्रिपद मिळाली नाहीत. आमच्या येथील एक उमेदवार बाशिंग बांधून तयार आहे. पण, त्यांना कोणतीही संधी मिळत नाही. सरकारमध्ये असंतोष खूप वाढत आहे. जास्त दिवस हा असंतोष टिकणार नाही. काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा : “मला तडजोड करावी लागली, तर मी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

“शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर आहे. जनतेचे प्रश्न खोळंबले आहेत. पाडापाडीचं आणि फोडाफोडीच्या राजकारणाला जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल,” असेही चंद्रकात खैरे म्हणाले.

Story img Loader