भाजपा आणि शिंदे गट सत्तेत एकत्र नांदत असला, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमग्राऊंड असलेल्या ठाण्यात स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमधील वाद गेल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपा आणि शिंदे गटात सुरू असलेल्या धुसफुशीच्या अनेक घटना चव्हाट्यावरही आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, हा वादातील कळीचा मुद्दा आहे.

यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ठाणे आणि कल्याणच्या जागेची मागणी अद्याप कुणीही केलेली नाही. केंद्रीय समिती यावर निर्णय घेईल,” असं बावनकुळेंनी सांगितलं. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Budget 2025 Is By The People, For The People, Says FM nirmala sitharaman
अर्थसंकल्प केवळ लोकांचा, लोकांसाठी – सीतारामन; मोदी यांच्या आग्रहामुळेच करकपात केल्याची माहिती
PM Modi Addresses Public Rally At RK Puram In Delhi
दिल्ली प्रचाराची आज सांगता!पंतप्रधानांकडून अर्थसंकल्पाची प्रशंसा; विरोधकांवर टीका
Narendra Modi On Budget 2025
Narendra Modi : “भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प”, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?

हेही वाचा : खा. श्रीकांत शिंदेंना लोकसभा निवडणुकीत धडा शिकवण्याची डोंबिवली भाजपची तयारी

ठाणे आणि कल्याण मतदारसंघावर भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. पण, शिंदे गटाकडूनही ठाणे आणि कल्याण मतदारसंघावर दावा केला जातोय. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “ठाणे आणि कल्याणच्या जागेची अद्याप कुणी मागणी केली नाही. अथवा कुणाला हा मतदारसंघ सोडण्यात आला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपाची केंद्रीय समिती हा निर्णय घेईल.”

हेही वाचा : कल्याणचा तिढा सुटला, ठाण्याचा संभ्रम कायम

“तसेच, एकनाथ शिंदे, अजित पवार, घटक पक्ष आणि आम्हाला किती जागा मिळणार, हे केंद्रीय समिती ठरवेल. यानंतर त्या जागा ५१ टक्के मतांनी निवडून आणणं, ही आमची जबाबदारी असेल. मोदींच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वोत्तम भारताला साथ देण्यासाठी ४५ खासदार निवडून आणणं, हा आमचा संकल्प आहे,” असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.

Story img Loader